4 महिन्यांपूर्वी घडली होती घटना
हे प्रकरण 23 मार्च 2025 रोजी घडले होते. घारेवाडीतील संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधाला आग लावली होती. मात्र, ही आग इतरत्र पसरू नये यासाठी कोणतीही पुरेशी खबरदारी घेतली नाही. परिणामी, ही आग वेगाने जवळच असलेल्या वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक 704 मध्ये पसरली. या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच भाग जळून खाक झाला होता.
advertisement
न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावली अनोखी शिक्षा
या घटनेनंतर, वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेऊन वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झाली. न्यायालयाने सर्व बाजू तपासून शेतकऱ्याला दोषी ठरवले आणि त्याला 3 हजार रुपयांचा दंड तसेच 100 झाडे लावण्याची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर, कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे वनपाल कांबळे, वनरक्षक अभिजित सावंत, संतोष पाटील आणि अरुण शिबे यांनी संबंधित शेतकऱ्याकडून वनक्षेत्रात 100 वृक्षांची लागवड करून घेतली. या शिक्षेमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि पर्यावरणाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : आधी प्रेम, मग अत्याचार! 'या' मुलीला इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात; मुलगा म्हणतोय, "जिवंत सोडणार नाही"
हे ही वाचा : धक्कादायक! पाणी समजून तणनाशक प्यायला, 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत