TRENDING:

Holi : ईद-ए-गुलाबी, जेव्हा हिंदूंसोबत मुसलमानही खेळायचे होळी, मुघल बादशाह हटके पद्धतीने साजरा करायचे हा सण

Last Updated:

Holi 2025 : माहितीनुसार मुस्लिम देखील शतकानुशतके विशेषतः मुघल काळात, हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : यावेळी होळी शुक्रवारी खेळली जात आहे. याच दिवशी मुसलमान शुक्रवारची नमाजही अदा करतात. होळी हा सण हिंदूंचा असं म्हटलं जातं. त्यामुळे शुक्रवारी होळी आणि त्याचदिवशी शुक्रवारची नमाज. मग नमाज अदा करायची ही नाही यावरून खूप गोंधळ उडाला. त्यामुळे होळी हा फक्त हिंदूंचा सण आहे का? असं प्रश्न उपस्थित होतो. पण माहितीनुसार मुस्लिम देखील शतकानुशतके विशेषतः मुघल काळात, हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत.
News18
News18
advertisement

अनेक लोकांचा असं म्हणतात की इस्लाममध्ये होळी खेळणं निषिद्ध आहे. उलटपक्षी प्राचीन काळी मुस्लिम देखील होळीच्या दिवशी हिंदूंसोबत रंग खेळत असत. मुघल काळात होळीबद्दल इतिहासकारांनी विस्तृतपणे लिहिलं आहे.

जर आपण मुघल सम्राटांबद्दल बोललो तर होळीचा उल्लेख जवळजवळ प्रत्येक युगात आढळतो. इतिहासकार मुन्शी जकुल्लाह यांनी तहरीक-ए-हिंदुस्तानीमध्ये लिहिलं आहे की, "कोण म्हणतं की होळी हा फक्त हिंदूंचा सण आहे?" मुघल काळातील होळीचं वर्णन जकुल्लाह करतात आणि हिंदूंना होळी खेळताना पाहून बाबर कसा आश्चर्यचकित झाला याचं वर्णन करतात. लोक एकमेकांना उचलत होते आणि रंगांनी भरलेल्या मोठ्या भांड्यांमध्ये टाकत होते.

advertisement

Mahabharat : आयुष्यभर अधर्म केलं तरी दुर्योधनाला स्वर्गात मिळालं स्थान, महाभारताचं हैराण करणारं रहस्य

आग्रा आणि दिल्लीच्या किल्ल्यांमध्ये होळी

टीओआयच्या वृत्तानुसार, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे माजी प्रादेशिक संचालक केके मुहम्मद यांच्या मते, मुघल काळात आग्रा किल्ला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये होळी ईदप्रमाणे साजरी केली जात असे. त्याला ईद-ए-गुलाबी (गुलाबी ईद) किंवा आब-ए-पशी (रंगीत फुलांचा पाऊस) असं म्हटलं जायचं. राजवाड्यांमध्ये फुलांपासून रंग बनवले जात होते आणि मोठ्या भांड्यांमध्ये भरले जात होते. नंतर स्प्रेअर्समध्ये गुलाबजल आणि केवडा परफ्यूम टाकले. यानंतर राजा आणि राणी त्यांच्या प्रजेसोबत होळी खेळत असत.

advertisement

'ईद-ए-गुलाबी' आणि 'आब-ए-पशी'

अबुल फजल यांनी ऐन-ए-अकबरीमध्ये लिहिलं आहे की मुघल सम्राट वर्षभर वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर पाण्याच्या तोफा गोळा करत असत आणि या उत्सवाबद्दल तो खूप उत्साहित असे. मुहम्मद म्हणाले, "सम्राट अकबर आग्रा येथील त्याच्या किल्ल्यातून बाहेर पडून सामान्य लोकांसोबत होळी खेळत असे, अशा दुर्मिळ प्रसंगांपैकी हा एक प्रसंग होता." तुझुक-ए-जहांगीरीमध्ये, सम्राट जहांगीरने उल्लेख केला आहे की तो सक्रियपणे होळी खेळत असे आणि 'मेहफिल-ए-होली' म्हणून ओळखले जाणारे उत्सव आयोजित करत असत. तथापि, संगीत आणि गाण्यांचा प्रेमी जहांगीर सामान्य लोकांसोबत होळी खेळत नसे, तर लाल किल्ल्याच्या खिडकीतून लोकांना रंगात भिजताना पाहत असे. त्यांच्या काळातच होळीला 'ईद-ए-गुलाबी' आणि 'आब-ए-पशी' अशी नावं देण्यात आली. जहांगीरची त्याची पत्नी नूरजहाँसोबत होळी खेळतानाची चित्रे गोवर्धन आणि रसिकसारख्या अनेक कलाकारांनी तयार केली आहेत.

advertisement

Mahabharat : पोटच्या लेकानेच केला होता वडिलांचा वध, मुलगा ठरला अर्जुनच्या मृत्यूचं कारण

बहादूर शाह जफर यांनी होली फाग लिहिलं होतं. तसंच एका उल्लेखनीय चित्रात, मुघल सम्राट मोहम्मद शाह रंगीला त्याच्या पत्नीसोबत पाण्याची तोफा घेऊन राजवाड्याभोवती धावताना दाखवले आहे. मोहम्मद शाह रंगीला 'सदरंग' या टोपणनावाने लिहित असत. रंगीलाने त्यांच्या एका रचनेत होळीच्या दृश्यांचे सविस्तर वर्णन केलं आहे. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर, ज्यांचे होळीचे फाग (गाणी) आजही ऐकू येतात, त्यांनी दरवर्षी होळीच्या वेळी त्यांच्या हिंदू मंत्र्यांना कपाळावर गुलाल लावण्याची परवानगी दिली.

advertisement

औरंगजेब वगळता चालू राहिली प्रथा

आग्र्याच्या इतिहासावर आधारित 'तवारीख-ए-आग्रा' य पुस्तकाचे लेखक इतिहासकार राज किशोर राजे यांनी यावर अधिक प्रकाश टाकला आणि म्हणाले, "अकबर, जहांगीर आणि शाहजहान यांच्या कारकिर्दीत आग्रा किल्ल्यात होळी साजरी केली जात होती. औरंगजेब आलमगीर वगळता त्यांच्या वारसांनी ही प्रथा चालू ठेवली. बहादूर शाह जफर हे आणखी एक मुघल शासक होते ज्यांना हिंदू समुदायासोबत सण साजरे करायला खूप आवडायचे. या शेवटच्या मुघल शासकाचा असा विश्वास होता की होळी हा प्रत्येक धर्माचा सण आहे. 1844 मध्ये एका उर्दू वृत्तपत्र जाम-ए-जहानुमाने लिहिले की जफरच्या काळात होळीसाठी विस्तृत व्यवस्था होती. तेसूच्या फुलांपासून रंग बनवला जात असे आणि राजे, राण्या आणि सामान्य लोक एकत्र होळी खेळत असत.

सूफी कवींनीही उत्सवाचा उपयोग केला

केवळ सम्राटांनीच नव्हे तर सूफी कवींनीही या उत्सवाचा उपयोग बंधुत्वाचा संदेश पसरवण्याची संधी म्हणून केला," असं एका ज्येष्ठ इतिहासकाराने सांगितलं. सूफी संत सय्यद अब्दुल्ला शाह कादरी, ज्यांना बाबा बुल्ले शाह म्हणून ओळखलं जातं, ज्यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये समान आदर आहे, त्यांनी “होरी खेलुंगी, कह बिस्मिल्लाह;” असं लिहिलं. पैगंबराचं नाव रत्न म्हणून अर्पण केलं गेलं, तो थेंब अल्लाहचा होता; ज्याने 'फना फि अल्लाह' शिकलं आहे, तो तुम्हाला रंगीबेरंगी रंगांनी फुलवू शकतो. तेराव्या शतकात, प्रसिद्ध कवी अमीर खुसरो यांनी या उत्सवाच्या स्मरणार्थ अनेक पदं लिहिली. "मी होळी खेळेन, खाजा माझ्या घरी येवो, माझं भाग्य धन्य असो मित्रा, खाजा माझ्या अंगणात आला आहे."

मुघल काळासह प्रथा संपली

अठराव्या शतकातील कवी कायम यांनी या सणाचं रंगांनी चित्रण केलं आहे. कयाम यांनी त्यांच्या 'चंदापूर की होली' या दीर्घ कवितेत एका मद्यधुंद मौलवीचं दृश्य चित्रित केलं आहे. जो मशिदीचा रस्ता विसरला आहे. होळीच्या दिवशी लोकांची हीच परिस्थिती असते. तो त्याच्या कवितेचा शेवट एका प्रार्थनेने करतो: “इलाही है जब तक, ये शोर ओ शार हो, आलम मियाँ, होली सेवकिसार.” (हे प्रभू, जोपर्यंत जग अस्तित्वात आहे तोपर्यंत जगात होळीचा सण चालू राहो). मुघल सल्तनतचे शेवटचे वारस, इब्राहिम आदिल शाह आणि वाजिद अली शाह हे होळीला मिठाई आणि थंडाई वाटायचे. मुघल साम्राज्याच्या अंतासह, होळीच्या दिवशी रंग खेळण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम एकत्र येण्याची परंपरा नाहीशी होऊ लागली.

मराठी बातम्या/Viral/
Holi : ईद-ए-गुलाबी, जेव्हा हिंदूंसोबत मुसलमानही खेळायचे होळी, मुघल बादशाह हटके पद्धतीने साजरा करायचे हा सण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल