सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये असं म्हटलं आहे, की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की पुढचा विनाशकारी ज्वालामुखी उद्रेक 1815मध्ये इंडोनेशियात झालेल्या 'माउंट तंबोरा'च्या उद्रेकापेक्षा अधिक धोकादायक असेल. तो आतापर्यंतचा सर्वांत भीषण ज्वालामुखी उद्रेक होता. त्यातून निघालेल्या धुळीच्या ढगांनी पृथ्वीचं तापमान कमालीचं कमी झालं होतं. त्या वर्षाला उन्हाळा नसलेलं वर्ष म्हटलं जातं. त्यामुळे जगभर पिकं नष्ट झाली, उपासमार झाली आणि कॉलरा महासाथ पसरली होती.
advertisement
आईस्क्रीमसारखं थंड होतं शहर, -41 डिग्रीपर्यंत जातं तापमान, मरून जातात शेकडो लोक
जिनिव्हा युनिव्हर्सिटीतले हवामान तज्ज्ञ मार्कस स्टॉफेल यांनी आठवण करून दिली, की ज्वालामुखी नेहमी ग्रहावर परिणाम करतात; पण आता त्यांच्यामुळे हवामानबदलाचा नवा धोका निर्माण झाला आहे. 1991मध्ये झालेल्या पिनाटुबो ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर 15 दशलक्ष टन सल्फर डायऑक्साइड वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर या थरात पसरला होता. त्यामुळे पृथ्वीचं तापमान 0.5 अंश सेल्सिअसने कमी झालं होतं. तंबोरा उद्रेकानंतर पृथ्वीचं तापमान एक अंश सेल्सिअसने कमी झालं होतं.
स्टॉफेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात गरम हवा वेगाने फिरते. त्यामुळे ज्वालामुखी उत्सर्जनातून बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साइड अधिक प्रभावीपणे पसरण्यास मदत होईल आणि ग्रहाचं तापमान झपाट्याने कमी होईल. महासागरांचा उबदार पृष्ठभागदेखील वातावरण लवकर थंड करण्यात मदत करील. याशिवाय हवामानबदलामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यताही वाढणार आहे.
Ajab Gajab : जगातील सर्वात मोठा Waterfall, डोंगरावरून नाही हा पाण्याच्या आत वाहतो
लॉयडच्या विश्लेषणानुसार, तंबोरासारख्या उद्रेकामुळे 3.6 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 3070 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, रशिया आणि चीनवर होईल, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. अशा घटना, कुठे आणि केव्हा घडतील हे सांगणं अशक्य आहे. इंडोनेशिया आणि अमेरिकेतल्या काही भागांचं बारकाईने निरीक्षण केलं जात आहे. तरीही तज्ज्ञ पुढच्या मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अंदाज लावू शकत नाहीत.