पावसाळ्याच्या दिवसात वीज पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. 1872 मध्ये, शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांनी पहिल्यांदा ढगांमध्ये वीज पडण्याचे नेमके कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले होते की ढगांमध्ये पाण्याचे छोटे कण असतात, जे हवेशी घर्षण झाल्यामुळे चार्ज होतात. काही ढग पॉझिटिव्ह चार्ज होतात, तर काही निगेटिव्ह चार्ज असतात
जेव्हा दोन्ही प्रकारचे चार्ज असलेले ढग आकाशात एकमेकांवर आदळतात तेव्हा लाखो व्होल्ट वीज निर्माण होते. काहीवेळा अशा प्रकारे निर्माण होणारी वीज पृथ्वीपर्यंत पोहोचते एवढी असते. या घटनेलाच विद्युल्लता म्हणतात.
advertisement
ढगफुटी म्हणजे नक्की काय? हे कशामुळे होतं माहितीय का?
या ठिकाणी सर्वाधिक वीज पडते
क्लायमेट रेझिलिएंट ऑब्झर्व्हिंग सिस्टम्स प्रमोशन कौन्सिल (CROPC) ने भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने एक नकाशा जारी केला आहे. ज्यामध्ये वीज पडलेल्या भागांची माहिती दिली आहे. त्यानुसार वीज पडण्याच्या सर्वाधिक घटना मध्य प्रदेशात घडतात. यानंतर छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि बंगालचा क्रमांक लागतो. या राज्यांव्यतिरिक्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातही वीज पडण्याच्या घटना घडतात.
विजेपासून स्वतःला कसे वाचवायचे?
खराब हवामानात किंवा विजा चमकत असताना तुम्ही घराच्या आत असता, तुम्ही विद्युत उपकरणांपासून दूर असले पाहिजे. या काळात वायर्ड टेलिफोन वापरू नये. खिडक्या आणि दारे बंद करून व्हरांडा आणि गच्चीपासून दूर राहावे. याशिवाय विजेचे चांगले वाहक असलेल्या वस्तूंपासूनही दूर राहिले पाहिजे. घरातील धातूचे पाइप, नळ, कारंजे, वॉश बेसिन इत्यादींच्या संपर्कापासून दूर राहावे.
घराबाहेर असाल तर विजेच्या खांबापासून दूर राहावे. याशिवाय झाडे विजेला आकर्षित करतात. त्यामुळे वीज पडताना झाडाखाली उभे राहू नये. उंच इमारती असलेल्या भागात आश्रय घेऊ नये आणि मोकळ्या मैदानात काही अंतरावर उभे राहावे. प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या वाहनातच राहावे. मोकळे छत असलेल्या वाहनात बसू नये. याशिवाय दुचाकी, विजेचे किंवा टेलिफोनचे खांब तारांचे कुंपण आणि मशिन इत्यादीपासून दूर रहावे.
