TRENDING:

वडिलांचं अंत्यसंस्कार करून 2 तासही झाले नव्हते, तोच 25 वर्षीय मुलाचा मृत्यू, घरातील आधारस्तंभ गमावल्याने आईचा आक्रोश

Last Updated:

कुटुंबाने दुःखी मनाने त्यांचा अंतिम संस्कार केला, पण त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच अजून मोठा आघात त्यांना झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जीवन आणि मृत्यूचा खेळ किती अनिश्चित असतो हे आपण अनेकदा ऐकतो. काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकांमध्ये बदलते आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. राजस्थानमधील कोटा शहरातील हरिओम नगर कच्ची बस्ती येथे असाच हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला आहे. येथे एका कुटुंबाने एका दिवसातच दोन सदस्य गमावले वडील आणि मुलगा, दोघांचेही निधन काही तासांच्या अंतराने झाले.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय पुरीलाल बैरवा हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपासून ते लकव्याच्या त्रासाने पीडित होते आणि मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाने दुःखी मनाने त्यांचा अंतिम संस्कार केला, पण त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच अजून मोठा आघात त्यांना बसला.

पुरीलाल यांचा 25 वर्षीय मुलगा राजू बैरवा हा वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने कोसळला. वडिलांची चिता थंड होण्याआधीच दोन तासांत त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचाही मृत्यू झाला. काही तासांच्या आत वडील आणि मुलगा दोघांना गमावल्याने घरच्यांचा विश्वासच बसेना. मोहल्ल्यातील लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि वातावरण शोकमग्न झाले.

advertisement

सोर्स : सोशल मीडिया

हा गरीब मजूर कुटुंब आर्थिकदृष्ट्या इतका कमकुवत होता की दोघांच्या अंतिम संस्कारासाठीही खर्च भागवणे शक्य झाले नाही. अशा वेळी परिसरातील लोक आणि ओळखीचे पुढे आले आणि चंदा जमवून अंतिम विधी पार पाडण्यात आला. आता या घरात फक्त आई, गुड्डी आणि 13 वर्षांचा धाकटा मुलगा अरविंद उरले आहेत. एकाच दिवशी पती आणि मुलगा गमावलेल्या आईचा आक्रोश थांबत नाही आणि अरविंद अजूनही या मोठ्या अपघातातून सावरू शकलेला नाही.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
वडिलांचं अंत्यसंस्कार करून 2 तासही झाले नव्हते, तोच 25 वर्षीय मुलाचा मृत्यू, घरातील आधारस्तंभ गमावल्याने आईचा आक्रोश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल