advertisement

Garuda Purana: कधी ना कधी केलेले पाप! अकाली मृत्युची 5 कारणे, गरुड पुराणात आहे उल्लेख

Last Updated:

Garuda Purana: आपण जे काही चांगलं-वाईट कर्म करतो, त्याचा परिणाम फक्त याच जन्मात नाही, तर मृत्यूनंतरच्या प्रवासावरही होतो, असं भगवान विष्णूंनी गरुडाला समजावून सांगितल्याचा यात उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार अशा काही चुका किंवा पापं आहेत..

News18
News18
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच हिंदू धर्मात गरुड पुराणाचं महत्त्व खूप मोठं आहे. गरुड पुराण फक्त एक धार्मिक पुस्तक नाही, तर जगण्याचं आणि मरण्याचं खरं गुपित यात सांगितलं आहे. आपण जे काही चांगलं-वाईट कर्म करतो, त्याचा परिणाम फक्त याच जन्मात नाही, तर मृत्यूनंतरच्या प्रवासावरही होतो, असं भगवान विष्णूंनी गरुडाला समजावून सांगितल्याचा यात उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार अशा काही चुका किंवा पापं आहेत, ज्यांच्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं आणि त्याला अकाली मृत्यूला सामोरे जावे लागू शकते.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्वान लोक किंवा ब्राह्मणांचा अपमान करणं आणि हिंसा करणं. जो माणूस ज्ञानाचा आणि संस्कारांचा आदर करत नाही, त्याच्या आत्म्याचं नुकसान होतं. दुसरं मोठं पाप म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई-वडिलांचा, आपल्याला शिकवणाऱ्या गुरुंचा आणि देवाचा अपमान करणं.
advertisement
तसेच आई-वडिलांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्याशी वाईट वागलं तर आयुष्यात खूप हाल सोसावं लागतं. तसंच परस्त्रीवर वाईट नजर ठेवणं, खोटं बोलणं, चोरी करणं किंवा मुक्या प्राण्यांची हत्या करणं या गोष्टी माणसाला अधोगतीकडे नेतात.
गरुड पुराण फक्त भीती दाखवत नाही, तर या चुका कशा सुधारायच्या हे सुद्धा सांगतं. आपल्याकडून काही वाईट घडलं असेल, तर देवाची भक्ती करणं, गंगा स्नान, दानधर्म करणं आणि आई-वडिलांची सेवा केल्यानं पापांचा भार कमी होतो. नेहमी खरं बोलणं, कुणालाही न दुखवणं आणि साधा आहार घेणं यामुळे मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध राहतात.
advertisement
थोडक्यात काय, तर आपलं आजचं जीवन आपल्या कर्माचा आरसा आहे; चांगलं वागलो तर सुख मिळतं आणि वाईट वागलो तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात, असे त्यात सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Garuda Purana: कधी ना कधी केलेले पाप! अकाली मृत्युची 5 कारणे, गरुड पुराणात आहे उल्लेख
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement