advertisement

Dental Hygiene : दिवसातून किती वेळा दात घासावेत ? झोपण्यापूर्वी दात घासणं का महत्त्वाचं ? जाणून घ्या दातांच्या आरोग्याचा आणि हृदयरोगाचा संंबंध

Last Updated:

दातांची स्वच्छता योग्यप्रकारे न होणं, दातांकडे दुर्लक्ष केल्यानं दात किडणं, वास येणं हा त्रास होतोच पण अधिक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. झोपण्यापूर्वी दात घासले नाहीत तर हृदयरोगाचा धोका जास्त असतो. तोंडाची स्वच्छता विशेषतः हृदयासाठी महत्त्वाची आहे.

News18
News18
मुंबई : दिवसाच्या सुरुवातीला आणि दिवस संपताना म्हणजे रात्री दात घासण्याची सवय ही आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. दात घासणं केवळ मौखिक आरोग्यासाठी नाही तर पूर्ण आरोग्यासाठी चांगली सवय का आहे ते समजून घेऊया.
दातांची स्वच्छता योग्यप्रकारे न होणं, दातांकडे दुर्लक्ष केल्यानं दात किडणं, वास येणं हा त्रास होतोच पण अधिक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. झोपण्यापूर्वी दात घासले नाहीत तर हृदयरोगाचा धोका जास्त असतो. तोंडाची स्वच्छता विशेषतः हृदयासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
रात्री दात न घासल्यानं दातांमधे कीड होण्याचा धोका वाढतो हे आपल्याला ठाऊक असतं पण 2023 च्या एका अभ्यासातून याविषयी महत्त्वाचे निष्कर्ष समोर आलेत. तोंडाची स्वच्छता कमी असणं म्हणजे हदयरोग होण्याची शक्यता वाढवणारा घटक आहे. यासाठी योग्य वेळी ब्रश करणं महत्त्वाचं आहे.
मौखिक आरोग्य आणि हृदयरोगाचा काय संबंध आहे समजून घेऊया. तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात, ज्यामुळे सूज येते आणि कालांतरानं त्याचा तुमच्या हृदयावर परिणाम होतो. ब्रश न केल्यानं थेट हृदयरोग होत नाही, पण मौखिक आरोग्य खराब असणं हे हृदयाला हानी पोहोचवू शकणाऱ्या अनेक घटकांपैकी एक आहे.
advertisement
नियमितपणे ब्रश करणाऱ्यांचं हृदय निरोगी असतं. दिवसातून कमीत कमी तीन वेळा ब्रश करणं आणि नियमितपणे फ्लॉस करणं हृदयरोगाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. दात घासण्याच्या सवयीमुळे हिरड्यांचे आजार आणि दात पडणं यासारख्या दंत समस्यांची शक्यता देखील कमी होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dental Hygiene : दिवसातून किती वेळा दात घासावेत ? झोपण्यापूर्वी दात घासणं का महत्त्वाचं ? जाणून घ्या दातांच्या आरोग्याचा आणि हृदयरोगाचा संंबंध
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement