तुमच्या अंगातलं रक्त हा जीव घेतो शोषून, झटक्यात करतो बरं! VIDEO
- Published by:News18 Marathi
Last Updated:
लीच थेरपीचा शरीराला नेमका फायदा काय होतो जाणून घ्या.
जालना, 27 ऑक्टोबर : आयुर्वेदाला भारतामध्ये अतिशय महत्त्व आहे. आधुनिक विज्ञान नव्हते त्याकाळी प्रत्येक रोगावर आयुर्वेदाच्या माध्यमातूनच इलाज केला जायचा कुठल्याही व्याधीवर इलाज करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगण्यात आले आहेत. या पंचक्रमांपैकी एक म्हणजे रक्त मोक्षन प्रकारामध्ये जलौकाअवचरण म्हणजेच लीच थेरेपी. या थेरपीचा शरीराला नेमका फायदा काय होतो याबद्दच जालन्यातील आयुर्वेदिक डॉक्टर विनायक कंकाळ यांनी माहिती दिली आहे.
आयुर्वेदामध्ये शरीरशुद्धीचे पाच कर्म सांगितले आहेत त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्शन आणि नस्य हे ते पाच प्रकार आहेत. यापैकीच एक असलेल्या रक्त मोक्षण प्रकारांमध्ये आणखी दोन प्रकार पडतात. एक म्हणजे जलौकाअवचरण आणि दुसरा म्हणजे शिरावेत. यापैकी पहिल्या प्रकाराला म्हणजेच या प्रकाराला जलौकाअवचरण लीच थेरेपी असे म्हटले जाते. आपल्या शरीरातून अशुद्ध रक्त आपण ज्या प्रकारे बाहेर काढतो त्या प्रकाराला लीच थेरेपी असे म्हटले जाते. जलाव का म्हणजेच जळू. जळू या प्राण्याला इंग्लिशमध्ये लिच म्हटलं जातं. जळू या प्राण्याला शरीराच्या कुठल्याही भागावर लावून त्या शरीराच्या भागातील अशुद्ध रक्त आपण काढू शकतो, असं डॉ. कंकाळ यांनी सांगितले.
advertisement
मुलांच्या चष्माचा नंबर कमी करण्यासाठी कसा असावा आहार? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
लीच थेरेपी करायची कोणावरलीच थेरेपी मुख्यतः त्वचारोगावर केली जाते. त्यामध्ये गजकर्ण, वांग, पिंपल्स, चेहऱ्यावरील काळे डाग या कारणांसाठी आपण लिच थेरेपी करू शकतो. याचबरोबर सांधेदुखीवर देखील आपण प्लीज थेरेपीचा वापर करू शकतो. सांध्यावर सूज असेल सांधे दुखत असतील तर या ठिकाणी जळू लावून आपण त्या भागातील अशुद्ध रक्त काढून रुग्णाला आराम मिळू शकतो. मुळव्याधीच्या काही प्रकारांमध्ये देखील लिच थेरेपी अतिशय परिणामकारक आहे, असं डॉ. कंकाळ यांनी सांगितले.
advertisement
Morning Routine : चहा की कॉफी, काय पिणं जास्त फायदेशीर? जाणून घ्या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर
लीच थेरेपी दर आठ दिवसांनी चार ते पाच वेळा घ्यावी लागते. तरच रुग्णाला आराम मिळू शकतो. लीच थेरेपी बरोबरच रुग्णाला औषधी देखील दिली जाते. लीच थेरेपी बरोबर दोन प्रकारच्या औषधी रुग्णाला दिल्या जातात. आधी पाचक औषधी दिल्या जातात आणि त्यानंतर रुग्ण बरा होण्यासाठी काही औषधी दिल्या जातात, असंही डॉ.कंकाळ सांगितले.
advertisement
(टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. News18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
October 27, 2023 12:21 PM IST