नवरा-बायकोच्या भांडणाने नातं तुटतंय? लगेच वापरा 'या' 5 टिप्स, संसाराची गाडी पुन्हा येईल रुळावर!

Last Updated:

Relationship Tips : नवरा-बायकोचं नातं म्हणजे आंबट-गोड क्षणांनी भरलेलं एक सुंदर नातं. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम, तर कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारी टोकाची भांडणं. खरं तर...

Relationship Tips
Relationship Tips
Relationship Tips : नवरा-बायकोचं नातं म्हणजे आंबट-गोड क्षणांनी भरलेलं एक सुंदर नातं. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम, तर कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारी टोकाची भांडणं. खरं तर, जिथे प्रेम असतं, तिथे रुसवे-फुगवे आणि वाद हे येतातच. पण जेव्हा ही भांडणं रोजचीच होतात आणि वाद मर्यादेबाहेर जातात, तेव्हा मात्र नात्याची गाडी रुळावरून घसरू लागते.
जर या भांडणांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर नात्यात एक असा दुरावा येतो, जो भरून काढणं कठीण होऊन बसतं. अशावेळी, परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे आहे. चला, जाणून घेऊया भांडणानंतर नवरा-बायकोने काय करावे आणि ही परिस्थिती कशी हाताळावी.
रोजच्या भांडणांवर रामबाण उपाय : रोजच्या कटकटीमुळे नात्यातील प्रेम आणि आपुलकी कमी होऊ लागते. हे टाळण्यासाठी खालील मार्ग नक्कीच मदत करतील.
advertisement
1) शांत झाल्यावर बोला : भांडणाच्या वेळी रागाच्या भरात असे शब्द तोंडून निघून जातात, जे मनाला खोलवर जखम करतात. त्यामुळे, वाद झाल्यावर थोडा वेळ घ्या, शांत व्हा आणि मगच एकमेकांशी बोला.
2) चर्चा करा, टाळाटाळ नको : भांडणाचा विषय तसाच सोडून देणे किंवा शांत बसल्याने मनातील राग आणि गैरसमज वाढतच जातो. त्यामुळे, शांतपणे एकत्र बसून भांडणाचे मूळ कारण काय आहे, यावर चर्चा करा.
advertisement
3) ऐकून घेण्याची सवय लावा : अनेकदा भांडणात दोघेही "मीच बरोबर" हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. यामुळे वाद मिटण्याऐवजी आणखी वाढतो. आधी तुमच्या पार्टनरचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या आणि मग तुमची बाजू मांडा.
4) 'सॉरी' म्हणायला लाजू नका : जर चूक तुमची असेल, तर माफी मागायला अजिबात संकोच करू नका. 'सॉरी' बोलल्याने तुम्ही लहान होत नाही, उलट तुमच्या नात्यातील समजूतदारपणा वाढतो.
advertisement
5) तिसऱ्या व्यक्तीला दूर ठेवा : नवरा-बायकोच्या भांडणात घरच्यांना किंवा मित्रांना आणणे टाळा. बाहेरची व्यक्ती अनेकदा वाद मिटवण्याऐवजी तो अधिक गुंतागुंतीचा करू शकते.
6) समुपदेशनाची मदत घ्या : जर वाद हाताबाहेर जात असतील, तर विवाह समुपदेशकाची (Marriage Counselor) मदत घ्यायला अजिबात लाजू नका.
तुमच्यात वाद का होतात? ही आहेत काही सामान्य कारणं...
advertisement
  • संवादाचा अभाव : मनातल्या भावना आणि गरजा योग्य शब्दात पार्टनरसमोर न मांडल्याने गैरसमज वाढतात.
  • अहंकार आणि हट्टीपणा : "मीच बरोबर" हा अहंकार नात्याला कमकुवत करतो.
  • बाहेरील हस्तक्षेप : सासरच्या लोकांचा किंवा इतर नातेवाईकांचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप वाद वाढवू शकतो.
  • वेळेचा अभाव : कामाच्या व्यापामुळे एकमेकांना वेळ न देऊ शकल्याने नात्यात दुरावा येतो.
  • अविश्वास : संशय कोणत्याही नात्याला पोखरून टाकतो.
  • कामात मदत न करणे : घरकाम किंवा मुलांच्या जबाबदारीत एकमेकांना मदत न केल्यानेही भांडणं होतात.
advertisement
भांडणानंतर पार्टनरला काय बोलाल?
भांडणानंतर शांतता आणि समजूतदारपणा राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही काही गोष्टी बोलून परिस्थिती सुधारू शकता.
  • भावनांची कदर करा : "मला माहित आहे की माझ्या बोलण्याने तुला खूप वाईट वाटलं आहे आणि मला त्याबद्दल खरंच खेद आहे."
  • चूक मान्य करा : "मी जे काही बोललो/केले, त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. मी पुन्हा असं वागणार नाही, याची काळजी घेईन."
advertisement
लक्षात ठेवा, एक छोटासा प्रयत्न तुमच्या नात्याला तुटण्यापासून वाचवू शकतो आणि ते अधिक मजबूत बनवू शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नवरा-बायकोच्या भांडणाने नातं तुटतंय? लगेच वापरा 'या' 5 टिप्स, संसाराची गाडी पुन्हा येईल रुळावर!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement