Health Risk Of The Day : दूध वारंवार गरम करणं धोकादायक, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

Last Updated:

Milk boiling effects on health : दूध जितक्या वेळा गरम करू तितकं चांगलं असं जवळपास सगळ्यांना वाटतं. पण दूध वारंवार गरम केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा विचारच कधी कुणी केला नसेल. 

News18
News18
मुंबई : बहुतेकांच्या घरात दूध हे असतंच. लहान मुलासाठी म्हणा, कॉफी किंवा चहासाठी म्हणा दूध लागतं. कुणी सुटं दूध घेतं, कुणी पाकिटातलं. दूध घेतलं की सगळ्यात आधी आपण काय करतो तर दूध गरम करतो. आता फ्रिज आहे त्यामुळे गरम केलेलं दूध थंड झालं की ते फ्रिजमध्ये ठेवतो. पुन्हा काढतो तेव्हा पुन्हा गरम करतो. म्हणजे जितक्या वेळा आपण ते दूध वापरतो तितक्या वेळा गरम करून घेतो. पण याचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का?
तुम्ही दिवसातून किती वेळा दूध गरम करता? एक... दोन... तीन... नाही... जितक्या वेळा ते वापराल तितक्या वेळा. बरोबर ना. दूध जितक्या वेळा गरम करू तितकं चांगलं असं जवळपास सगळ्यांना वाटतं. कारण काय तर दूध खराब होणार नाही. शिवाय फ्रिजमधलं दूध थंड मग ते कसं काय वापरणार, असा प्रश्न असतो. पण दूध वारंवार गरम करणं खरंच गरजेचं आहे, दूध वारंवार गरम केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा विचारच कधी कुणी केला नसेल. दूध गरम करण्याचाही धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
advertisement
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दूध वारंवार गरम करणं हे एडव्हान्स ग्लायसेशन इन प्रोडक्ट वाढवणारं आहे आणि हे ओबेसिटीजन आहे. यात दोन मुख्य मॉलक्युल असतात. एक सीएमएल म्हणजे कार्बोक्झिमिथेलाइसिन किंवा सीईएल कार्बोक्झिइशेलाइसिन. या प्रकारचे केमिकल्स तयार होतात.
advertisement
हे केमिकल्स तुमच्या रक्तवाहिन्यांना कडक करतात. तुमच्या आरबीसीना कडक करतात आरबीसीची फ्लेक्झिबिलिटी किंवा फ्लुइसिटी जाते आणि मग ते छोट्या छोट्या रक्तवाहिन्यातून जात नाहीत आणि मग अटॅक येतो. किंवा मग लिव्हरची सूज वाढायला लागते. लिव्हरमधली चरबी वाढायला लागते.
advertisement
याबाबत बरेच रिसर्च आहेत. पण असे रिसर्च फूड इंडस्ट्री वर येऊ देत नाहीत, अशी माहिती डॉ. मुकुंद सबनीस यांनी एका पॉडकास्टवर ही माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : दूध वारंवार गरम करणं धोकादायक, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement