Sambhajinagar Crime : लग्न जुळलं, टिळा झाला! पण 4 दिवसात असं काय घडलं? प्रसादने शेतात जाऊन आयुष्य संपवलं

Last Updated:

Sambhajinagar Crime News : प्रसाद बराच वेळ फोन उचलत नसल्याने त्याचे मित्र आणि कुटुंबीय काळजीपोटी शेतात पोहोचले, तेव्हा तो तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका गावावर सध्या शोककळा पसरली असून, एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असलेल्या एका तरुणाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये. ही घटना ढाकेफळ येथे घडली असून, गावात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. एका लग्न ठरलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.

काळजीपोटी शेतात पोहोचले अन्...

प्रसाद भाऊसाहेब शिंदे (वय 22) असे या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रसाद बराच वेळ फोन उचलत नसल्याने त्याचे मित्र आणि कुटुंबीय काळजीपोटी शेतात पोहोचले, तेव्हा तो तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासात मृत घोषित केलं. प्रसादने विष प्राशन करून आपली आयुष्य संपवल्याचे समोर आलं आहे.
advertisement

26 जानेवारी रोजी लग्न होतं

या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे, कारण प्रसाद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. संपूर्ण घराची आणि शेतीची जबाबदारी तो समर्थपणे सांभाळत होता. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर म्हणजे 26 जानेवारी रोजी त्याचं लग्न होणार होतं. लग्नाची खरेदी आणि तयारी जोरात सुरू असतानाच ही काळाने झडप घातल्याने गावातील प्रत्येक जण हळहळत आहे.
advertisement

आकस्मिक मृत्यूची नोंद  

दरम्यान, प्रसादचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि कष्टकरी होता, त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar Crime : लग्न जुळलं, टिळा झाला! पण 4 दिवसात असं काय घडलं? प्रसादने शेतात जाऊन आयुष्य संपवलं
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement