advertisement

भावाला भेटायला गेले 3 जिगरी दोस्त, परत येताना घडला अनर्थ, तिघांचाही मन हेलावून टाकणारा शेवट

Last Updated:

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील सरवडी गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील तीन जिगरी मित्रांचा एकाच दिवशी शेवट झाला आहे.

News18
News18
लातूर: लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील सरवडी गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील तीन जिगरी मित्र एका मित्राच्या भावाला भेटायला दुचाकीने गेले होते. भावाला भेटून परत येत असताना या तिघांसोबत अनर्थ घडला आणि दोस्तीचा भयावह अंत झाला. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे सरवडी गावावर शोककळा पसरली आहे. तीन मित्रांचा अशाप्रकारे एकाच दिवशी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमनाथ दयानंद हिप्परगे (२२), अभिजित शाहुराज इंगळे (२३) आणि दिगंबर दत्ता इंगळे (२७) असं मृत पावलेल्या तीन मित्रांची नावं आहेत. हे तिघेही मित्र एकाच दुचाकीवरून लातूर येथे सोमनाथच्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा ते आपल्या गावी परत येत असताना औसा-लामजना रस्त्यावरील करजगाव पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली.
advertisement
उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू
अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
मृतांपैकी दिगंबर इंगळे हा विवाहित होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर, अभिजित इंगळे आणि सोमनाथ हिप्परगे हे दोघे अविवाहित होते. विशेष म्हणजे, अभिजित हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. सोमवारी दुपारी तिन्ही मित्रांवर सरवडी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या तीन मित्रांची घरे शेजारी-शेजारी आहेत. तिघंही बालपणापासून एकमेकांना ओळखतात. अशा तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
भावाला भेटायला गेले 3 जिगरी दोस्त, परत येताना घडला अनर्थ, तिघांचाही मन हेलावून टाकणारा शेवट
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement