Devendra Fadnavis : आता 'त्या' कुबड्याच फडणवीसांवर अवलंबून, काँग्रेस नेत्याचा महायुतीवर बोचरा वार

Last Updated:

Maharashtra Government Formation Devendra Fadnavis : भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी कुबड्यांची गरज नाही. आता आहेत त्या कुबड्या फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याची टीका करण्यात आली.

आता 'त्या' कुबड्याच फडणवीसांवर अवलंबून, काँग्रेस नेत्याचा महायुतीवर बोचरा वार
आता 'त्या' कुबड्याच फडणवीसांवर अवलंबून, काँग्रेस नेत्याचा महायुतीवर बोचरा वार
उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीमधील सत्ता स्थापनेचा घोळ कायम आहे. येत्या एक-दोन दिवसात हा घोळ संपण्याची चिन्हे आहेत. तर, दुसरीकडे सरकार स्थापनेला लागत असलेला वेळ पाहून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्रीपदावरून दावा सोडावा लागत असल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी कुबड्यांची गरज नाही. आता आहेत त्या कुबड्या फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याची टीका करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी म्हटले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री होत असतील तर ही विदर्भाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. विदर्भाचा बॅकलॉग गेल्या 7-8 वर्षात पूर्ण झाला नाही. आता त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आहेत. आता त्यांना काम करण्यासाठी फ्री हॅन्ड असून कोणीही थांबवू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भाचा बॅकलॉग, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
advertisement

आता बदला घेणार नाही....

देवेंद्र फडणवीस हे आता विदर्भाला न्याय देतील अशी अपेक्षा बाळगूया असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे बदला घेणारे राजकारण करतात. आता, त्यांच्याकडून या गोष्टी होणार नसल्याचे अपेक्षा ठेवायला हरकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक कोणी कोणाचेही वैरी नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी काही भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल
advertisement
आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते छाप पडतील अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.

शिंदे-पवारांची महायुतीमधील उपयुक्ता संपली...

विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाला साधला. त्यांनी म्हटले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेतील सर्वोच्च पद मिळत नाही. त्यावेळी चेहरा पडलेला दिसतो, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेना लगावला. 2029 मध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता पूर्ण संपलेली असेल असेही त्यांनी सांगितले. त्यांना सत्तेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या आशिर्वादाने राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही ते विरोध ही करणार नाही असेही त्यांनी म्हटले.
advertisement

इतर संबंधित बातमी :

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : आता 'त्या' कुबड्याच फडणवीसांवर अवलंबून, काँग्रेस नेत्याचा महायुतीवर बोचरा वार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement