MVA Press Conference : फॉर्म नंबर 7 वापरून भाजपचा रडीचा डाव, मतदारयादीवरून मविआचा खळबळजनक आरोप
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Election 2024 : राज्यात काही मतदारसंघात खोट्या मतदारांची नावे नोंदवली जात असल्याचा धक्कादायक असा आरोप महाविकास आघाडीने केला.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्यात काही मतदारसंघात खोट्या मतदारांची नावे नोंदवली जात असल्याचा धक्कादायक असा आरोप महाविकास आघाडीने केला. संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआ नेत्यांनी अनेक आरोप केले. चिखली गावात मतदारयादीतून नावं वगळली आहेत. नावं कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.
मतदार यादीतून नावं कमी करण्यासाठी ७ नंबरचा फॉर्म भरला जातोय, मतदारांची नावं कमी केली जात आहेत.
खोट्या ऑनलाइन अर्जांचा पर्दाफाश मविआने केला. मतदार याद्यांमधून अनेक नावं वगळण्याचे आदेश भाजपनं दिल्याचा आरोप मविआने केला. महायुतीकडून रडीचा डाव खेळला जात आहे. हिंमत असेल तर समोर येऊन लढा असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं.
advertisement
लोकसभेत आघाडीला जिथं जास्त मतं मिळाली त्या मतदारसंघांमध्ये अडीच ते १० हजार मतं कमी कशी करता येतील यासाठी प्लॅनिंग महायुती करत आहेत. ज्या निवडणुका आपण जिंकूच शकत नाही त्यासाठी त्यांचा हा प्लॅन असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी थेट फडणवीस आणि शिंदेंवर आरोप केले. मतदान कार्डवर फोटो वेगळा आणि माणसू वेगळा असल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी कार्डचा फोटोच दाखवला.
advertisement
फॉर्म नंबर ७ कोण भरतं याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. प्रत्येक मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर फॉर्म नंबर ७ भरला गेला आहे. अनेक ठिकाणे माणसं मृत दाखवली आहेत. ती जिवंत आहेत. सिन्नर मतदारसंघात ५ हजार नावं अशी शोधली गेली. जर त्यांना मृत दाखवलं होतं तर ती नावं परत कशी आली? सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. एकाच घरातली पाच माणसं वेगवेगळ्या बूथवर मतदानाला कशी जातात? असं कसं घडतं असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
advertisement
असलेली नावं काढायची आणि नसलेली नावं त्यात भर टाकायची, हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. निवडणूक आयोगाने यावर कडक कारवाई करावी. निवडणूक आयोगाने वोटिंग फ्रॉम होम ही योजना आहे, वयस्क आणि दिव्यांगासाठी ही योजना आहे. पण ते मत घेताना प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी सोबत घेतल्याशिवाय अशा लोकांचे मतदान घेतले जाऊ नये अशी मागणी मविआकडून करण्यात आली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 18, 2024 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MVA Press Conference : फॉर्म नंबर 7 वापरून भाजपचा रडीचा डाव, मतदारयादीवरून मविआचा खळबळजनक आरोप









