Maharashtra Elections Uddhav Thackeray : पहिल्याच प्रचारसभेत उद्धव यांचा मास्टरस्ट्रोक, पाच मोठ्या घोषणा, जाणून घ्या ठळक मुद्दे
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Election Rally Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
कोल्हापूर : दिवाळीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजारपणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून आपल्या प्रचारसभांना सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. उद्धव यांनी यावेळी आश्वासनांचा वर्षाव केला. महायुती सरकारवर उद्धव यांनी जोरदार हल्लाबोल केला. खोके सरकारला आता भस्म करण्याची वेळ आली आहे. निवडणूक आली म्हणून लाडकी बहीण आठवली असल्याचे टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचे त्यांनी म्हटले.
>> उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- तुमच्या मनामध्ये राग आहे गेले अडीच वर्षे हा राग हृदयात ठेवलाय
- अजूनही आपणाला न्याय मिळालेला नाही. न्यायदेवताच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे पण न्याय नाही
- मी सुद्धा त्यांच्या सोबत जाऊ शकलो असतो. त्यांना पन्नास खोके दिले मी गेलो असतो तर गोदाम भरले असते. गद्दारी माझ्या रक्तात नाही
advertisement
- धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे
- शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ मोदींच्या हस्ते अनावरण करण्यासाठी घाई-घाईने उभा केला. आठ महिन्यात पुतळा कोसळून पडतो. जाऊ तिथे खाऊ असं सरकारचं सुरू आहे.
- हे सरकार टक्केवारीचे आहे,खोके सरकार आहे
- निवडणूक जवळ आल्यावर बहीण दिसली
- बदलापूर मध्ये अत्याचार झाला तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. कोणत्या तोंडाने तिच्या आईला लाडकी बहिणीचा लाभ देणार
advertisement
- योजनेच्या समोर महागाई वाढते ती लोकांच्या आवाक्यात नाही.
- ठेकेदारांचे पैसे खायचे,राज्य विकायचे,पुतळा उभारताना पैसे खायचे
- कोश्यारीने शिवाजी महाराजांचा अपमान केला. भाजपने निषेध नाही केला. दाढी खांजळून निषेध नाही केला. आम्ही मोर्चा काढला
- जय शिवाजी जय भवानी मशाल गीतातले शब्द काढायला आम्हाला सांगत आहेत. तसे न केल्यास कारवाईची भिती घालत आहेत.
advertisement
- मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे वाढवले नव्हते.
- आमचे सरकार आले तर जीवनावश्यक वस्तुंचें भाव स्थिर ठेवणार
- सरकार पण स्थिर भाव पण स्थिर
- मराठी आणि गुजरात असा वाद कधी होऊ देणार नाही
- आमच्या राज्याचा घास लुबाडणार असाल तर ते होऊ देणार नाही
advertisement
- अडीच वर्षात माझे काय चुकले सांगा
- शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत, शिवभोजन थाळी, नंबर वन राज्य बनवले होते की नाही
- आमचे काय चुकले होते का सरकार आमचे पाडले
- महाराष्ट्र मधला एक सुद्धा उद्योग बाहेर जाऊ देत नव्हतो. एवढा दरारा आमचा होता म्हणून सरकार पाडले.
- ही गद्दारी केवळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी नाही महाराष्ट्रसोबत केली
advertisement
- महाराष्ट्र त्यांना गुजरातला विकायचा आहे म्हणून त्यांना बसवले
- मुलींच्या प्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार. मुली-मुले आमचे आधारस्तंभ आहे
- महिला पोलिसांची भरती करणार
- स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभी करणार
- आपले सरकार मुंबईत परवडेल अशी घरे देणार
- शेतकऱ्याना हमीभाव देणार
- गद्दारी करून सरकार पाडले नसते तर पुन्हा कर्ज मुक्त केले असते
advertisement
- बटेंगे तो कंटेंगे म्हणतात आम्ही तुटू देणार नाही, आम्ही लुटू देणार नाही
- मशाल पेटणार खोकेवाले भस्म होणार
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Nov 05, 2024 3:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Uddhav Thackeray : पहिल्याच प्रचारसभेत उद्धव यांचा मास्टरस्ट्रोक, पाच मोठ्या घोषणा, जाणून घ्या ठळक मुद्दे










