advertisement

ग्रामपंचायतीचे कामं लवकर होत नाहीये का? सरपंच,ग्रामसेवकाची तक्रार कुठे करायची?

Last Updated:

Agriculture News : राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत होणारी विकासाची कामे किंवा शासकीय योजना वेळेवर पूर्ण होत नाहीत. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, गटारी बांधकाम, स्वच्छता व्यवस्था किंवा शासकीय योजना राबविण्याबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात.

GramPanchayat
GramPanchayat
मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत होणारी विकासाची कामे किंवा शासकीय योजना वेळेवर पूर्ण होत नाहीत. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, गटारी बांधकाम, स्वच्छता व्यवस्था किंवा शासकीय योजना राबविण्याबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात. पण सरपंच, ग्रामसेवक किंवा इतर अधिकारी वेळेत काम पूर्ण करत नाहीत, अशी नाराजी गावकऱ्यांमध्ये वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी योग्य तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीची जबाबदारी
ग्रामपंचायत ही गावच्या प्राथमिक विकासासाठी जबाबदार संस्था आहे. ७३व्या घटनादुरुस्तीमुळे तिला घटनात्मक मान्यता मिळाली आहे. गावातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, शासकीय योजना, जन्म-मृत्यू दाखले, इमारत परवाने, कर वसुली, तसेच केंद्र-राज्य सरकारच्या योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असून ग्रामसेवक हा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो.
तक्रार कुठे करावी?
जर ग्रामपंचायतीकडून काम लांबणीवर टाकले जात असेल किंवा सरपंच-ग्रामसेवक कामात टोलवाटोलवी करत असतील, तर नागरिकांकडे खालील पर्याय उपलब्ध आहेत
advertisement
तालुका पंचायत समिती कार्यालय : प्रथम तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करता येते. ते ग्रामपंचायतीच्या कामावर नियंत्रण ठेवतात.
जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : जर पंचायत समितीकडून कारवाई झाली नाही, तर जिल्हा परिषदेतील सीईओ यांच्याकडे लिखित तक्रार देता येते.
ग्रामसभा : प्रत्येक गावात ग्रामसभेचा अधिकार आहे. ग्रामसभेत प्रश्न मांडून अधिकृतरीत्या ठराव नोंदवला जाऊ शकतो. हा ठराव बंधनकारक असतो.
advertisement
लोकशाहीरित्या निवडणूक आयोगाकडे तक्रार : सरपंच किंवा सदस्यांकडून गैरवर्तन, भ्रष्टाचार किंवा निष्क्रियता दिसून आल्यास, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येते.
ऑनलाईन पोर्टल्स : सरकारने ‘आमच्या सरकार’ किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिक तक्रार नोंदवू शकतात.
तक्रारीची पद्धत
तक्रार करताना संबंधित कामाचे स्वरूप, अर्जाची प्रत, कागदपत्रे, तसेच ग्रामसेवक किंवा सरपंचाने दिलेले उत्तर (असल्यास) याची नोंद ठेवावी. तक्रार लेखी स्वरूपात दोन प्रतिंमध्ये सादर करावी. एक प्रत कार्यालयाकडे जमा करून दुसऱ्या प्रतीवर स्वीकाराची पावती घ्यावी.
advertisement
कायदेशीर उपाय
जर तक्रारीवर कारवाई झाली नाही, तर महसूल अधिकारी, लोकायुक्त कार्यालय किंवा हायकोर्टात याचिका दाखल करून न्याय मिळविता येतो. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, १९५८ नुसार सरपंच अथवा ग्रामसेवकाने कर्तव्यच्युती केली असल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ग्रामपंचायतीचे कामं लवकर होत नाहीये का? सरपंच,ग्रामसेवकाची तक्रार कुठे करायची?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement