कॅन्सरनं गाठलं अन् गॅरेज सुटलं, पण तो हारला नाही, आज करतोय लाखोंची कमाई

Last Updated:

संकटानं कोसळून जाईल तो शेतकरी कसला. कॅन्सरनं गाठलं तरी हार न मानता शेतकरी लाखोंची कमाई करतोय.

+
कॅन्सरनं

कॅन्सरनं गाठलं अन् गॅरेज सुटलं, पण तो हारला नाही, आज करतोय लाखोंची कमाई

पुणे, 2 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील शेतकरी शेती क्षेत्रात नवनवे प्रयोग करताना दिसून येतात. पारंपारिक शेतीच्या सोबतच आधुनिक शेतीच्या प्रयोगातून शेतकरी लाखोंचं उत्पादन घेतात. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेचे शेतकरी गौतम राठोड यांनी आपल्या शेतात अनोखा प्रयोग केला आहे. थेट काश्मीरमध्ये पिकणाऱ्या केशरची शेती ते करत आहेत. विशेष म्हणजे कर्करोगासारख्या दूर्धर आजारावर मात करत त्यांनी हे यश मिळवलंय.
कर्करोगानं गाठलं पण जिद्द सोडली नाही
केशरची शेती ही मुख्यत: काश्मीरमध्ये केली जाते. परंतु आता काश्मीरसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देखील केशर पिकवलं जातंय. तळेगाव दाभाडे परिसरात राहणाऱ्या गौतम राठोड याचं शिक्षण बी. कॉम पर्यंत झालं आहे. ते यापूर्वी गॅरेज चालवत होते. हे करत असतानाच त्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यात त्यांची उजवी किडनी निकामी झाली आणि ती काढावी लागली. त्यामुळं अवजड कामं करणं त्यांना शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
केशर शेतीची कल्पना कशी सुचली?
नातेवाईकाने पाठवलेला केसर शेतीचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी हीच शेती करण्याचा निर्णय घेतला. मग या शेतीवर संशोधन करायला सुरुवात केली. काश्मीरमध्ये जावून केशर शेतीची माहिती घेतली. तसेच विविध कार्यशाळांतून केशर लागवडीचे प्रशिक्षण घेतले. त्यातून छतावरील एका बंदिस्त प्लॉटमध्ये केशरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इमारतीच्या छतावर व्हर्टीकल फार्मिंगद्वारे सुमारे दीड एकर जमिनीच्या समतूल्य केशर लागवडीसाठी वातावरण तयार केले, असे राठोड सांगतात.
advertisement
या शेतीमधून कसं उत्पन्न मिळतं?
केशर शेतीसाठी 4 महिन्यांचा कालावधी असतो. त्यामध्ये ही फुलं येतात. 250 किलो बी आणले होते त्यातील 50 किलो हे छोटे निघाले. आता 200 किलोंची लागवड केली आहे. यामधून 500 ग्रॅम चे केसर भेटणार आहे. याचे रेट 400 रुपये पासून ते 800 रुपयेपर्यत आहे. त्यामुळेच या शेती मधून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. ही शेती करताना कुठल्याही केमिकलचा वापर केला जात नाही. तशी ही शेती करण्यास देखील सोपी आहे, असे राठोड सांगतात.
advertisement
परिस्थिती कुठली ही असो त्यामध्ये खचून न जाता त्यातून मार्ग काढला पाहिजे. आजारातून बाहेर पडत आणि केशर शेती यशस्वी करून असाच काहीसा संदेश राठोड यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कॅन्सरनं गाठलं अन् गॅरेज सुटलं, पण तो हारला नाही, आज करतोय लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement