'शेअर्सपासून दूर राहा' स्टॉकमधून तुफान पैसा कमावणाऱ्या शंकर शर्मा यांनी बहीण-मेहुण्याला का दिला असा सल्ला?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शंकर शर्मा यांनी त्यांच्या बहिणी आणि भावजयांना गेल्या ३५ वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून रोखले आहे. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया .
नवी दिल्ली: प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून शेअर बाजारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, पैसे गुंतवण्यासाठी शेअर बाजार हा सर्वोत्तम पर्याय नाही. त्याऐवजी, त्यांनी मुदत ठेवी, सोने आणि जमिनीत गुंतवणुकीचा पर्याय सुचवला आहे. त्यांच्या या पोस्टवर काही लोकांनी सहमती दर्शवली, तर काहींनी प्रश्न उपस्थित केले की, स्वतः शेअर बाजारातून कोट्यवधी रुपये कमावणारे शर्मा आता लोकांना असा सल्ला का देत आहेत?
गेल्या ३५ वर्षांपासून गुंतवणुकीबाबत देत आहेत सल्ला
शंकर शर्मा यांनी त्यांच्या बहिणी आणि भावजयांना गेल्या ३५ वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून रोखले आहे. त्यांनी त्यांना ४०% पैसे मुदत ठेवीत (एफडी), ३०% सोने आणि उर्वरित ३०% पैसे शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीत गुंतवण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणूक धोरणामुळे त्यांना चांगले आर्थिक स्थैर्य मिळाले असून, ते तणावमुक्त आणि सुरक्षित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
"स्टॉक मार्केट सर्वांसाठी नाही" – शंकर शर्मा
शंकर शर्मा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "स्टॉक मार्केट हे सर्वसामान्य लोकांसाठी नाही." त्यांनी स्पष्ट केले की, गुंतवणुकीसाठी एफडी आणि सोन्यासारखे सुरक्षित पर्याय अधिक चांगले ठरू शकतात. त्यांनी शेअर बाजारात मोठा नफा मिळवण्यासाठी नशिबाचीही मोठी भूमिका असते असे सांगितले.
My sis & bro in law live in a small town. Have pestered me for 35 years " Tell us where/ how to invest in stocks/ MFs". My Std reply: " Stay away. This isn't for folks like y'all. Put 40% in good FDs, 30% in Gold. 30% in raw land 25 kms out of town".
Today, they are stress-free,…
— Shankar Sharma (@1shankarsharma) March 12, 2025
advertisement
शेअर बाजारात फारच कमी लोक मोठा नफा कमावतात
शर्मा यांनी शेअर बाजारात दीर्घकालीन नफा टिकवून ठेवणे किती कठीण आहे, यावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, गेल्या ३५ वर्षांत फक्त ५०-७० लोकांनीच शेअर बाजारातून मोठा नफा कमावला आहे. त्यांच्या मते, भाग्याचा मोठा वाटा असतो आणि प्रत्येक जण शेअर बाजारात यशस्वी होईलच असे नाही.
advertisement
गुंतवणूकदारांनी काय करावे?
गुंतवणूकदारांनी कोणत्याही गुंतवणुकीच्या निर्णयापूर्वी विशेषज्ञांचा सल्ला घ्यावा. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते आणि दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी योग्य रणनीती आवश्यक असते. त्यामुळे एफडी, सोन्यातील गुंतवणूक आणि जमिनीच्या मालमत्तेकडेही पाहायला हवे, असे शंकर शर्मा सुचवतात.
Location :
First Published :
March 15, 2025 2:17 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
'शेअर्सपासून दूर राहा' स्टॉकमधून तुफान पैसा कमावणाऱ्या शंकर शर्मा यांनी बहीण-मेहुण्याला का दिला असा सल्ला?