मोठी बातमी! मुंबई नाशिक महामार्गावर 4 महिने वाहतुक बदल; कोणता रस्ता बंद,कोणता सुरु?
Last Updated:
Mumbai Nashik Highway Update : मुंबई-नाशिक महामार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे पुढील चार महिने वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या काळात काही मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जिथे तब्बल चार महिने मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. या बदलाचे कारण काय आणि या बदलात केलेले पर्यायी मार्ग कोणते असतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कधी पासून असणार वाहतूक बदल?
मुंबई- नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसी सुरू आहे. या कामाअंतर्गत खारेगाव भुयारी मार्गावर महत्त्वाची कामे केली जाणार असल्याने उद्यापासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून पुढील चार महिन्यांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
जाणून घ्या पर्यायी?
भिवंडी, कळवा, ठाणे, कल्याण तसेच नवी मुंबईकडे जाणारी हजारो वाहने दररोज मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून या महामार्गावरील माजिवडा ते वडपे दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून आता खारेगाव भुयारी मार्ग परिसरात कामाचा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
advertisement
खारेगाव भुयारी मार्गाने खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गात प्रवेश करता येणार नाही. ही वाहने खारेगाव टोलनाका, गॅमन रोड आणि पारसिक चौक मार्गे किंवा साकेत येथून खाडी पुलावरून मार्गक्रमण करतील.
तसेच खारेगाव भुयारी मार्गावरून मुंबई-नाशिक महामार्गाने भिवंडी किंवा ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी राहणार आहे. भिवंडीकडे जाणारी वाहने खारेगाव, पारसिक चौक आणि गॅमन रोड मार्गे जातील तर ठाण्याकडे जाणारी वाहने कळवा खाडी पुलाचा वापर करतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! मुंबई नाशिक महामार्गावर 4 महिने वाहतुक बदल; कोणता रस्ता बंद,कोणता सुरु?








