Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट; आठवड्यातून दोन दिवस पुरवठा राहणार बंद
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवी मुंबईकरांवर डिसेंबर महिन्यापासूनच पाणीकपातीची टांगती तलवार आहे. डिसेंबर महिन्यापासूनच एमआयडीसीने उरण परिसरामध्ये आठवड्यातील दोन दिवसांसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईकरांवर डिसेंबर महिन्यापासूनच पाणीकपातीची टांगती तलवार आहे. डिसेंबर महिन्यापासूनच एमआयडीसीने उरण परिसरामध्ये आठवड्यातील दोन दिवसांसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसाई धराणातील पाण्याचा साठा घटल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. फार लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नवी मुंबईकरांचे पाण्याचे टेंशन चांगलेच वाढले आहे.
उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसाई धरणातील पाण्याची पातळी आणि उरणकरांना लागत असलेल्या पाण्याची मागणी- पुरवठा यामध्ये निर्माण झालेल्या तफावतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, रानसाई धरणातील पाणीसाठा मोठ्या चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. पाणीसाठ्याची पातळी सारख्या प्रमाणावर कायम ठेवायची असेल तर, पाणी कपात करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नागरिकांना पुढचा एक महिना तरी, पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. रानसाई धरणाची पाणी क्षमता फार कमी आहे, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते.
advertisement
शिवाय, रानसाई धरणाची पाणी क्षमता कमी असल्यामुळे, आवश्यकतेनुसार पाण्याची साठवणूक करता येत नाही. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठीचा त्रास सहन करावा लागतो. या भागात दिवसाला तब्बल 41 मिलियन लिटरहून अधिक पाणी वापरले जाते, तर सध्याच्या उपलब्ध साठ्यानुसार एमआयडीसी फक्त 30 मिलियन लिटर पुरवठा करू शकते. त्यामुळे पाण्याचा उपलब्ध साठा जून 2026 पर्यंत कायम वापरण्यासाठी एमआयडीसीने आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
नवी मुंबईच्या उरण परिसरामध्ये, पाणीकपात दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे. पाण्याचा उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी एमआयडीसी संवर्धनात्मक रणनीती आखत आहे..
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Dec 14, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट; आठवड्यातून दोन दिवस पुरवठा राहणार बंद







