Explainer : ज्ञानेशकुमारांविरोधात महाभियोग! मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवता येतं का? कशी असते प्रक्रिया
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Explainer : मुख्य निवडणूक आयुक्तांना महाभियोग प्रस्ताव आणून हटवता येते का? संविधान काय सांगतं?
नवी दिल्ली: बिहारमधील मतदार यादीची सुधारणा मोहीम म्हणजेच 'एसआयआर'वरून आणि 'मत चोरी' सारख्या आरोपांवरून विरोधकांच्या इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार विरोधी पक्ष करत असल्याची बातमी आहे. सोमवारी सकाळी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत महाभियोगाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी पक्ष लोकशाहीच्या सर्व संवैधानिक शस्त्रांचा वापर करण्यास तयार असल्याचे म्हटले. जर गरज पडली तर आम्ही लोकशाही अंतर्गत उपलब्ध असलेली सर्व शस्त्रे वापरू. महाभियोगावर आतापर्यंत कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही, परंतु गरज पडल्यास आम्ही काहीही करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत, मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणता येईल का आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्या...
advertisement
मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवता येतं का?
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याची प्रक्रिया भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेली आहे. संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखीच आहे. याचा अर्थ असा की त्यांना फक्त महाभियोगाद्वारेच काढून टाकता येते.
advertisement
महाभियोगाची प्रक्रिया काय आहे?
मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यासाठी दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहात, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेत प्रस्ताव आणता येतो. हा प्रस्ताव सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावा लागेल. त्यानंतर, प्रस्ताव दुसऱ्या सभागृहात जाईल आणि तेथेही दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करणे बंधनकारक आहे.
advertisement
दोन्ही सभागृहांनी महाभियोग प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याचा आदेश देऊ शकतात.
महाभियोग आणणं किती आव्हानात्मक?
व्यावहारिकदृष्ट्या, मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकणे ही एक अतिशय कठीण प्रक्रिया आहे. महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड बहुमत आवश्यक आहे. संसदेतील सध्याचे संख्याबळ पाहता, विरोधकांना इतका पाठिंबा मिळवणे सोपे जाणार नाही. दोन तृतीयांश बहुमत प्रचंड आहे आणि सध्या विरोधकांच्या
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/देश/
Explainer : ज्ञानेशकुमारांविरोधात महाभियोग! मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवता येतं का? कशी असते प्रक्रिया