advertisement

2030-31 पर्यंत अटल पेन्शन योजना (एपीवाय) सुरु ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Last Updated:

केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजना 2030-31 पर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली. 8.66 कोटी सदस्य, असंघटित कामगारांसाठी वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा, भारत @2047 चे स्वप्न.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अटल पेन्शन योजना (एपीवाय) आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत चालू ठेवण्यास तसेच प्रोत्साहनात्मक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी निधी सहाय्य आणि व्यवहार्यता तफावत निधी सुरु ठेवण्यास मंजुरी दिली.
अंमलबजावणी धोरण :
ही योजना सरकारच्या सहकार्याने 2030-31 पर्यंत सुरू राहील –
असंघटित कामगारांमध्ये जागरूकता, क्षमता बांधणीसह पोहोच वाढवण्यासाठी प्रोत्साहनात्मक  आणि विकासात्मक उपक्रम.
  • व्यवहार्यता आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि योजनेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी तफावत निधी
    प्रमुख परिणाम :
    अल्प उत्पन्न असलेल्या आणि असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा सुनिश्चित करते.
    advertisement
  • आर्थिक समावेशकता  वाढवते आणि भारताला पेन्शन-आधारित समाजात परिवर्तित होण्यासाठी सहाय्य पुरवते .
  • शाश्वत सामाजिक सुरक्षा प्रदान करून विकसित भारत @2047 च्या स्वप्नाला बळ देते
    पार्श्वभूमी : 
    प्रारंभ : असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 9 मे 2015 रोजी अटल पेन्शन योजना (एपीवाय ) सुरू करण्यात आली.
    advertisement
  • योजनेची वैशिष्ट्ये: एपीवाय वयाच्या  60 व्या वर्षापासून योगदानाच्या आधारे दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत  किमान पेन्शनची हमी  देते.
  • प्रगती: 19 जानेवारी 2026 पर्यंत,8.66 कोटींहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली असून  एपीवाय भारताच्या समावेशक सामाजिक सुरक्षा चौकटीचा एक आधारस्तंभ बनला आहे.
  • विस्ताराची आवश्यकता: योजनेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी  जागरूकता, क्षमता निर्मिती आणि व्यवहार्यता तफावत भरून काढण्यासाठी सातत्यपूर्ण सरकारी पाठिंबा आवश्यक आहे.
    advertisement
    view comments
    मराठी बातम्या/देश/
    2030-31 पर्यंत अटल पेन्शन योजना (एपीवाय) सुरु ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
    Next Article
    advertisement
    Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
    राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
    • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

    • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

    • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

    View All
    advertisement