सोलापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा, 15 हजारांत बनवलं जुगाड, पेरणीचं टेन्शनच मिटलं
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
हे पेरणी यंत्र मानव, ट्रॅक्टर तसेच पावर टिलर चलित आहे. यामुळे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते.
शेती करताना सर्वात अवघड काम म्हणजे कोणत्या पिकांची पेरणी करणे होय. यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज लागते. त्यासोबतच वेळ पण वाया जातो. हेच काम सोपे होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या रणजीत निंबाळकर यांनी पेरणी यंत्र तयार केले आहे. हे पेरणी यंत्र मानव, ट्रॅक्टर तसेच पावर टिलर चलित आहे. यामुळे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते.
advertisement
सध्याच्या घडीला पाहिले गेले तर शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये शेती अवजारांमध्येही मोठे बदल होत आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेत रणजीत निंबाळकर यांनी हरिहर ऍग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून मानव, ट्रॅक्टर आणि पावर टिलर चलित पेरणी यंत्र विकसित केले आहे.
advertisement
advertisement
सध्या बहुतांश पेरणी यंत्रांमध्ये काही प्रमाणात बियाणे शिल्लक ठेवावे लागते. रणजीत निंबाळकर यांनी तयार केलेल्या नव्या यंत्रामध्ये बियाणे शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण बियाण्याची अचूक पेरणी होते. या पेरणी यंत्राद्वारे कांदा, मेथी, कोथिंबीर, मका, सोयाबीन, कापूस, गाजर, तूर, भुईमूग यांसारख्या विविध पिकांची पेरणी करता येते. या यंत्राला बनवण्यासाठी 15 हजार खर्च आला आहे. तर याची किंमत 25 हजार रुपये आहे.
advertisement








