advertisement

संकष्ट चतुर्थीचे व्रत! उपवास करत असाल तर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, काय खावं?

Last Updated:
हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो.
1/7
हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो. या उपवासाचे धार्मिक महत्त्व जितके आहे, तितकेच त्याचे नियम आणि पथ्ये पाळणेही महत्त्वाचे आहे.
हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो. या उपवासाचे धार्मिक महत्त्व जितके आहे, तितकेच त्याचे नियम आणि पथ्ये पाळणेही महत्त्वाचे आहे.
advertisement
2/7
कंदमुळे आणि फळे: उपवासाच्या दिवशी फळे आणि कंदमुळे जसे की रताळे, बटाटे यांचे सेवन करावे. फळांच्या रसाचे सेवन करणे देखील उत्तम आहे.
कंदमुळे आणि फळे: उपवासाच्या दिवशी फळे आणि कंदमुळे जसे की रताळे, बटाटे यांचे सेवन करावे. फळांच्या रसाचे सेवन करणे देखील उत्तम आहे.
advertisement
3/7
शेंगदाणे आणि राजगिरा: उपवासासाठी शेंगदाणे आणि राजगिरा हे उत्तम स्रोत आहेत. राजगिऱ्याची खीर किंवा लाडू खाणे ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
शेंगदाणे आणि राजगिरा: उपवासासाठी शेंगदाणे आणि राजगिरा हे उत्तम स्रोत आहेत. राजगिऱ्याची खीर किंवा लाडू खाणे ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
advertisement
4/7
साधे दूध आणि दही: दिवसभर शरीराला ताकद देण्यासाठी दूध, दही किंवा ताक प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
साधे दूध आणि दही: दिवसभर शरीराला ताकद देण्यासाठी दूध, दही किंवा ताक प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
advertisement
5/7
धान्य आणि डाळी: संकष्ट चतुर्थीच्या उपवासात तांदूळ, गहू, मैदा किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळी खाऊ नयेत. त्याऐवजी साबुदाणा, वरईचे तांदूळ किंवा भगरीचा वापर करावा.
धान्य आणि डाळी: संकष्ट चतुर्थीच्या उपवासात तांदूळ, गहू, मैदा किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळी खाऊ नयेत. त्याऐवजी साबुदाणा, वरईचे तांदूळ किंवा भगरीचा वापर करावा.
advertisement
6/7
साधे मीठ आणि मसाले: उपवासात साधे मीठ वापरणे टाळावे. त्याऐवजी सैंधव मीठ आणि कमी मसाले जसे की जीरे, काळी मिरी वापरावेत.
साधे मीठ आणि मसाले: उपवासात साधे मीठ वापरणे टाळावे. त्याऐवजी सैंधव मीठ आणि कमी मसाले जसे की जीरे, काळी मिरी वापरावेत.
advertisement
7/7
तामसी भोजन: उपवासाच्या दिवशी मांस, मद्य किंवा तामसी भोजन यांचे सेवन पूर्णपणे टाळावे, कारण यामुळे व्रताची शुद्धता भंग होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
तामसी भोजन: उपवासाच्या दिवशी मांस, मद्य किंवा तामसी भोजन यांचे सेवन पूर्णपणे टाळावे, कारण यामुळे व्रताची शुद्धता भंग होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement