Vastu Tips: उन्हाळ्यात मातीचा माठ आणला, पण ठेवलाय कुठे? दिशा चुकली तर येतील अडचणी!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Vastu Tips: उन्हाळ्यात घराघरात मातीचा माठ आणला जातो. वास्तूशास्त्रानुसार हा माठ योग्य दिशेला ठेवल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होऊ शकतो.
advertisement
मातीचा माठ कोणत्याही दिशेला ठेवणं हे वास्तूशास्त्रानुसार अजिबात योग्य मानलं जात नाही. कारण वास्तूशास्त्रानुसार भांडे ठेवण्यासाठी योग्य दिशा निवडणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. याबाबत ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांनी माहिती दिलीये.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार, देवता घराच्या उत्तरेकडे राहतात. या दिशेला पाण्याने भरलेला भांडे किंवा माठ ठेवल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात भांडे ठेवणे देखील शुभ मानले जाते. या दोन्ही दिशांवर गुरु ग्रहाचा प्रभाव आहे. तो ज्ञान, वाढ आणि विकासाचे प्रतीक प्रतिक मानला जातो.
advertisement
advertisement
पाण्याचे भांडे नेहमी झाकून ठेवा, पण प्लास्टिकचे झाकण वापरू नका. यामुळे नफा कमी होऊ शकतो. त्याऐवजी मातीचे झाकण वापरा. ते नैसर्गिक उर्जेचे संतुलन करते आणि अनेक पटींनी फायदा वाढवते. परंतु, ज्या ठिकाणी मटका ठेवला आहे, ती जागा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची घाण ही सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबवू शकते.
advertisement
advertisement







