'जेव्हा जेव्हा ते स्क्रीनवर दिसायचे...', IKKIS पाहून रितेश देशमुख भावूक; धर्मेंद्र यांच्या आठवणीने भरून आले डोळे
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Last Film Ikkis: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. रितेशने त्यांच्याबद्दल अत्यंत हळवं विधान केलंय.
advertisement
advertisement
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या शैलीचे चाहते जगभर आहेत, पण 'इक्कीस' पाहिल्यानंतर रितेशने त्यांना सलाम ठोकला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रितेश म्हणतो, "मी 'इक्कीस' पाहिला आणि अक्षरशः निशब्द झालो. हा केवळ एक युद्धपट नाही, तर हा एक असा अनुभव आहे जो तुम्हाला थेट रणांगणाच्या वास्तवात नेऊन सोडतो. श्रीराम राघवन यांनी हा सिनेमा अत्यंत ताकदीने उभा केला आहे."
advertisement
या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र. हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. रितेशने त्यांच्याबद्दल अत्यंत हळवं विधान केलंय. तो म्हणतो, "मोठ्या पडद्यावर धरमजींना पाहणं माझ्यासाठी खूप भावनिक होतं. ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसायचे, तेव्हा मी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. प्रत्येक क्षण जिद्दीने जगणं काय असतं, हे त्यांनी शिकवलं. धरमजी, तुमची आणि तुमच्या त्या अफाट प्रतिभेची आम्हाला कायम आठवण येईल."
advertisement
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रितेशच्या मते, या दोघांनीही बाजी मारली आहे. "प्रिय अगस्त्य, तू कमाल केलीस! परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणं सोपं नव्हतं, पण तू ते सहज केलं. तू मोठ्या पडद्यासाठीच बनला आहेस, मला तुझा अभिमान आहे!" अशा शब्दांत रितेशने त्याचं कौतुक केलं. इतकंच नाही, तर अवघ्या १८ व्या वर्षी सिमरने दाखवलेला आत्मविश्वास पाहून रितेश थक्क झाला आहे. तिचा सहज वावर प्रत्येक सीन उजळून टाकतो, असं त्याने नमूद केलं.
advertisement









