रेल्वे स्टेशनवर झोपला, चहाच्या टपरीवर काम; नॅशनल अवॉर्ड जाहीर होताच घेतला जगाचा निरोप, हा फिल्ममेकर कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Filmmaker : अनुराग कश्यप चीन आणि कोरियन फिल्ममेकर्सकडून प्रेरणा घेत असल्याचं अनेकदा म्हणतात. पण हिंदी मनोरंजनसृष्टीतील एका दिग्गज दिग्दर्शकाकडूनही त्यांना प्रेरणा मिळते.
advertisement
advertisement
अवतार कौल हे नाव जास्त कोणी ऐकलेलंही नसेल. त्यांनी आपल्या 35 वर्षांच्या सिनेकारकिर्दीत फक्त एक चित्रपट दिला आहे. पण हा एक सिनेमा कोणीही विसरू शकलं नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. 27 डाउन असं या चित्रपटाचं नाव आहे. नॅशनल अवॉर्ड जाहीर झाल्याच्या काही तासांतर अवतार कौल यांनी जगाचा निरोप घेतला.
advertisement
advertisement
advertisement
'द वायर'मधील एका लेखात विनोद कौल यांनी आपल्या काकांबद्दल म्हणजेच अवतार कौल यांच्याबद्दल लिहिलं आहे,"अवतार यांना त्यांच्या वडिलांनीच खूप त्रास दिला होता. एके दिवशी रागाच्या भरात वडिलांनी त्यांना घराबाहेर काढून टाकले आणि कधीही परत न येण्याचं सांगितलं. कोणताही आसरा नसल्यामुळे अवतारला दिल्ली रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले आणि चहाच्या टपरीवर काम करावे लागले. अवतारचं एकंदरीत बालपण खूप भयावह होतं".
advertisement
अवतार कौल यांच्या भाच्यानं त्यांच्या आयुष्याबद्दल सांगताना म्हटलं की ते नेहमी आपल्या कुटुंबाला सर्वात जास्त महत्त्व देत असत. पहिल्या चित्रपटानंतरच जगाचा निरोप घेतलेल्या दिग्दर्शक अवतार कौल यांच्या जवळ मृत्यूपूर्वी तीन चित्रपटांच्या स्क्रिप्ट होत्या. अवतार आज हयात असते तर त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली असती.


