Rinku Rajguru : 'मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता पण...' मग कुठे बिनसलं, रिंकूने अखेर सगळं सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू पहिल्यांदाच तिच्या प्रेमाबद्दल बोलली. तिचा तिच्या प्रेमावर खूप विश्वास होता मग नेमकं कुठे बिनसलं?
अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लव्ह लाईफची मागील अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू आहे. एका मुलाखतीत रिंकूनं मला बॉयफ्रेंड नको नवरा पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर आता एका नव्या मुलाखतीत रिंकूनं तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं. तिचा तिनं केलेल्या प्रेमावर विश्वास होता पण असं काय झालं? कुठे बिनसलं? या सगळ्याबद्दल सांगितलं.
advertisement
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली, "मी जर कुणावर प्रचंड प्रेम करत असेल तर मी सगळं सहन करते, जे काही असेल ते. सगळ्या गोष्टी मिटवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणारी मी मुलगी आहे. एका पॉइंटला तुम्हाला ते रिअलाइज होतं की, समोरचा जाणून बुजून तुम्हाला डिचवण्यासाठी करतोय हे कळतं. तुम्हाला ग्रॅटेंट घेतलं जातंय, कुठेतरी हलक्यात घेतलं जातंय, कुठे जाणार आहे, काय करणार आहे?"
advertisement
advertisement
advertisement
रिंकू पुढे म्हणाली, "अशी माणसं माझ्या आयुष्यात एकदाच आलीत. तेव्हाच मला कळलं की मी एक्सट्रिम आहे, प्रचंड सेन्सेटिव्ह आहे मला ग्रँन्टेड घेणं, हलक्यात घेणं आवडत नाही. कोणाच्या फिलिंग्ससोबत खेळलं की मला प्रचंड वाईट वाटतं. त्यामुळे मी खूप शांत होते. उद्या तो येऊन मला म्हणाला की, हत्ती उडाला तर मी म्हणेन हो उडाला."
advertisement
"अशा माणसांसोबत मी पुन्हा काम करणार नाही. मला माझ्यापेक्षा ते महत्त्वाचे नाहीत. मला वाईट वागता येत नाही. मी शांत राहिन, मी डिस्टन्स मेनेंट करेन. मी चार चौघात प्रेमानं बोलेन, मी मदतही करेन. पण मी पुन्हा तिथे जाणार नाही. पुढच्या त्रास होणार नाही म्हणून मी लांबून मदत करेन. कारण एकेकाळी आपण जीव लावलेला असतो. मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता आणि आहे पण समोरचा तसा होता तर आपण काय करणार."
advertisement









