Sharad Ponkshe: 'या मुंबईचं काहीतरी होऊ शकतं', बाळासाहेबांचं नाव घेत शरद पोंक्षेंनी व्यक्त केली भीती

Last Updated:
Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात. अशातच आता शरद पोंक्षेंचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचे ते शब्द खरे ठरल्याचं सांगितलं.
1/7
अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात. अशातच आता शरद पोंक्षेंचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचे ते शब्द खरे ठरल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ नेमका काय आहे? आणि शरद पोंक्षे बाळासाहेबांच्या कोणत्या शब्दांविषयी बोलले आहेत याविषयी पाहूया.
अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात. अशातच आता शरद पोंक्षेंचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचे ते शब्द खरे ठरल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ नेमका काय आहे? आणि शरद पोंक्षे बाळासाहेबांच्या कोणत्या शब्दांविषयी बोलले आहेत याविषयी पाहूया.
advertisement
2/7
देशातील वाढत्या लोकसंख्येवर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांवरील वाढत्या ताणावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे 1995 मधील भाषण आठवताना सांगितले की, "मुंबईत येणारे लोंढे आता थांबायला हवेत, अन्यथा एक दिवस ही मुंबई फुटेल." त्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
देशातील वाढत्या लोकसंख्येवर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांवरील वाढत्या ताणावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे 1995 मधील भाषण आठवताना सांगितले की, "मुंबईत येणारे लोंढे आता थांबायला हवेत, अन्यथा एक दिवस ही मुंबई फुटेल." त्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
3/7
व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे काय म्हणाले? गेल्या 50 वर्षांत मुंबईने मोठे बदल पाहिले आहेत. विकासाच्या नावाखाली सतत सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि टॉवर्सच्या वाढत्या जाळ्यामुळे शहराचा विस्फोटक विस्तार झाला आहे. "पूर्वी मुंबई फक्त सात बेटांवर वसली होती, पण आता ती पालघरपर्यंत पसरली आहे.
व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे काय म्हणाले? गेल्या 50 वर्षांत मुंबईने मोठे बदल पाहिले आहेत. विकासाच्या नावाखाली सतत सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि टॉवर्सच्या वाढत्या जाळ्यामुळे शहराचा विस्फोटक विस्तार झाला आहे. "पूर्वी मुंबई फक्त सात बेटांवर वसली होती, पण आता ती पालघरपर्यंत पसरली आहे.
advertisement
4/7
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी, वीज, वाहतूक, कचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्या गंभीर होत चालल्या आहेत. "शहराला एक मर्यादा असते, संसाधनांची पुरवठा करण्याची एक मर्यादा असते. पण या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला नियोजनशून्य पद्धतीने सामावून घेतलं जातंय," अशी त्यांची खंत आहे.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी, वीज, वाहतूक, कचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्या गंभीर होत चालल्या आहेत. "शहराला एक मर्यादा असते, संसाधनांची पुरवठा करण्याची एक मर्यादा असते. पण या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला नियोजनशून्य पद्धतीने सामावून घेतलं जातंय," अशी त्यांची खंत आहे.
advertisement
5/7
मुंबईत 30-40 मजल्यांचे टॉवर्स मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. हे कुठे थांबणार आहे? आज पुणेसुद्धा त्याच मार्गावर चाललं आहे, असे सांगताना त्यांनी वाढत्या बांधकामांमुळे येणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
मुंबईत 30-40 मजल्यांचे टॉवर्स मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. हे कुठे थांबणार आहे? आज पुणेसुद्धा त्याच मार्गावर चाललं आहे, असे सांगताना त्यांनी वाढत्या बांधकामांमुळे येणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
advertisement
6/7
बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी खरी ठरतेय? 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं होतं की, "मुंबईतील लोंढे रोखले गेले नाहीत, तर शहराची घडी विस्कटेल." 1947 साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने येथे राहिले ते तीन कोटी होते. 78 वर्षात ते 30 कोटी झाले आहे. म्हणजेच जवळपास 10 टक्क्यांनी वाढले. त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय होतं? आता काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये पाहिलं ना ते घडतं. माझ्या राजकीय राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वांना कळकळीची विनंती आहे की, मुंबई पुण्यासारखे शहरातले लोंढे आता थांबवा. खर तर थांबवण्याची फार गरज आहे. ही मुंबई एक दिवस फुटे.
बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी खरी ठरतेय? 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं होतं की, "मुंबईतील लोंढे रोखले गेले नाहीत, तर शहराची घडी विस्कटेल." 1947 साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने येथे राहिले ते तीन कोटी होते. 78 वर्षात ते 30 कोटी झाले आहे. म्हणजेच जवळपास 10 टक्क्यांनी वाढले. त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय होतं? आता काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये पाहिलं ना ते घडतं. माझ्या राजकीय राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वांना कळकळीची विनंती आहे की, मुंबई पुण्यासारखे शहरातले लोंढे आता थांबवा. खर तर थांबवण्याची फार गरज आहे. ही मुंबई एक दिवस फुटे.
advertisement
7/7
शरद पोंक्षे यांच्या मते, आजच्या परिस्थितीवर त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. लोकसंख्या वाढत आहे, शहरांवरचा भार वाढतोय, पण कोणताही राजकीय पक्ष यावर उपाययोजना करताना दिसत नाही. झोपडपट्ट्या अधिकृत करून मतांसाठी राजकारण केले जाते," अशी टीका करत त्यांनी शहराच्या नियोजनाबाबत चिंता व्यक्त केली.
शरद पोंक्षे यांच्या मते, आजच्या परिस्थितीवर त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. लोकसंख्या वाढत आहे, शहरांवरचा भार वाढतोय, पण कोणताही राजकीय पक्ष यावर उपाययोजना करताना दिसत नाही. झोपडपट्ट्या अधिकृत करून मतांसाठी राजकारण केले जाते," अशी टीका करत त्यांनी शहराच्या नियोजनाबाबत चिंता व्यक्त केली.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement