Fruits : रात्री फळे खाल्ल्याने खरोखरच वजन वाढते? काय सांगते विज्ञान आणि आयुर्वेदाचा 'हा' महत्त्वाचा सल्ला
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इंटरनेटवर याबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. कोणी म्हणते फळे कधीही खावीत, तर कोणी रात्री फळे खाणे 'विषासमान' मानतात. पण यामागील नेमके शास्त्रीय कारण काय? आज आपण या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी आईस्क्रीम किंवा चॉकलेट खाण्यापेक्षा 'फळ' खाणे हा एक आरोग्यदायी पर्याय वाटतो. पण, फिट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांच्या मनात एक शंका नेहमी घर करून असते. "रात्री फळे खाल्ल्याने वजन वाढते का?" इंटरनेटवर याबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. कोणी म्हणते फळे कधीही खावीत, तर कोणी रात्री फळे खाणे 'विषासमान' मानतात. पण यामागील नेमके शास्त्रीय कारण काय? आज आपण या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
advertisement
रात्री फळे खाणे आणि वजन वाढणे: काय आहे विज्ञानाचे मत?वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, केवळ रात्री फळे खाल्ल्याने वजन वाढते असा कोणताही ठोस पुरावा नाही. वजन वाढणे हे तुमच्या दिवसभराच्या एकूण 'कॅलरी इनटेक'वर (Calorie Intake) अवलंबून असते. मात्र, तरीही रात्री फळे खाताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग रात्री फळे खावीत की नाही?जर तुम्हाला रात्री फळे खायचीच असतील, तर खालील नियमांचे पालन करा.वेळ पाळा: झोपण्यापूर्वी किमान 2-3 तास आधी फळे खावीत.रात्रीच्या वेळी जास्त गोड फळांऐवजी संत्री, पेरू किंवा पपई यांसारखी कमी कॅलरी असलेली फळे निवडावीत.फळांचा मोठा बाऊल खाण्याऐवजी केवळ काही फोडी खाव्यात.जेवणानंतर लगेच फळ खाणे टाळा. जेवण आणि फळ यामध्ये किमान 1 तासाचे अंतर असावे.







