Couple Age Gap : 3, 5 की 7; लग्नासाठी पती-पत्नीत वयाचा फरक किती असावा? लहान-मोठे असतील तर काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Age Gap For Marriage : आपल्या समाजात असं मानलं जातं की पतीचं वय पत्नीच्या वयापेक्षा जास्त असलं पाहिजे. पण अशी अनेक यशस्वी जोडपी आहेत ज्यात पत्नी पतीपेक्षा मोठी आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर किती असावं?
आपल्या भारतीय समाजात पती पत्नीपेक्षा मोठा असावा असा एक सामान्य समज आहे. शतकानुशतके जुन्या परंपरेनुसार पती-पत्नीमधील तीन ते पाच वर्षांचा वयाचा फरक आदर्श मानला जातो. समाजाचा एक मोठा वर्ग अजूनही या मानसिकतेचे पालन करतो. समाजानुसार वयातील योग्य अंतर नात्यात संतुलन राखण्यास मदत करतं. विज्ञानानुसार वयातील योग्य अंतर हे दोन्ही जोडीदार मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या किती प्रौढ आहेत यावर अवलंबून असतं.
advertisement
जर तुम्हाला वाटत असेल की पती-पत्नीमधील वयाचा फरक फक्त एक सामाजिक प्रथा आहे, तर तसं नाही. विज्ञान देखील हेच सांगतं. विज्ञानानुसार शारीरिक आणि मानसिक परिपक्वता दोन्ही महत्त्वाच्या आहेत. हार्मोनल बदलांमुळे, मुली सहसा मुलांपेक्षा लवकर शारीरिक आणि मानसिक परिपक्वता गाठतात. मुलींमध्ये हे हार्मोनल बदल 7 ते 13 वयोगटात सुरू होतात, तर मुलांमध्ये 9 ते 15 वयोगटात. म्हणूनच मुली मुलांपूर्वी संभोगासाठी तयार असतात.
advertisement
ही वैज्ञानिक वस्तुस्थिती केवळ शारीरिक परिपक्वता दर्शवते. याचा अर्थ असा नाही की हार्मोनल बदल सुरू होताच लग्नाचं वय आलं आहे. जगभरातील देशांमध्ये लैंगिक संबंध आणि लग्नासाठी वेगवेगळे किमान वय आहे. भारतात, मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे आहे. पती-पत्नीमध्ये तीन वर्षांचा वयाचा फरक कायदेशीररित्या स्वीकार्य आहे.
advertisement
समाजात अशी अनेक लग्न आहेत जी पत्नी पतीपेक्षा मोठी असूनही यशस्वी झाली आहेत. लग्नाची वयोमर्यादा तोडून यशस्वी विवाहांची उदाहरणे देणारे अनेक कपल्स आहेत. उदाहरणार्थ अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांच्यात 15 वर्षांचा वयाचा फरक आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यात 11 वर्षांचा वयाचा फरक आहे. उलट प्रियांका चोप्राने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या निक जोनासशी लग्न केलं.
advertisement
विवाह म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नाही. म्हणूनच केवळ वैज्ञानिक निकष लग्नाचं वय ठरवू शकत नाहीत. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता वेगळी असते. वयाच्या फरकापेक्षा नात्यात समज, विश्वास आणि आदर कमी महत्त्वाचा असतो. यशस्वी विवाह केवळ वयाच्या फरकावर आधारित नसून एकमेकांवरील प्रेम, आदर आणि समजुतीवर आधारित असतो. वयाचा फरक तीन वर्षांचा असो वा पंधरा वर्षांचा, खरोखर यशस्वी नातं ते असते जिथे दोन्ही जोडीदार एकमेकांची परिपक्वता आणि विचार करण्याची पद्धत समजून घेतात आणि एकमेकांना आधार देतात. (सर्व फोटो : प्रतीकात्मक, AI Generated)









