पर्यटकांचेही आवडते ठिकाण, अमरावतीत पेढा खावा तर इथंच, अशी चव कुठेच नाही
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पूर्णानागर असं या गावाचं नाव आहे. या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात. फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून पेढा बनवला जातो. त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे येथील पेढा फार प्रसिद्ध झाला आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे आहेत जिथे काही ना काही पदार्थ हा फेमस असतो. त्यामुळे त्या ठिकाणाला एक वेगळी ओळख मिळते. अमरावतीमध्येही असं एक गाव असून पेढ्यांचं गाव म्हणून याला ओळख मिळाली आहे. पूर्णानागर असं या गावाचं नाव आहे. या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात. फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून पेढा बनवला जातो. त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे येथील पेढा फार प्रसिद्ध झाला आहे.
advertisement
advertisement
गावातील शीतल बोबडे यांनी सर्वात अगोदर 25 ते 26 वर्षांपूर्वी पेढ्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा हा व्यवसाय हिट ठरला. त्यानंतर गावातील अनेक तरुणांनी हा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. आता पूर्णानागर बस स्टॉपला पेढ्यांची 15 ते 16 दुकाने आहेत. या पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त दूध आणि साखर वापरून हा पेढा बनवला जातो. यामध्ये कोणतेही केमिकल किंवा इतर पदार्थ वापरले जात नाही. साखरेचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. 1 लिटर दूध असेल तर 75 ग्रॅम साखर वापरली जाते.
advertisement
advertisement









