Health Tips: शुगर असूनही दिवाळीत गोडधोड खाल्लंय? रिस्क नको, लगेच करा हे उपाय!

Last Updated:
Health Tips: दिवाळीत सगळेजणच गोडधोड, मिठाई खातात. पण असं गोडधोड खाणं अनेकांना महागात पडू शकतं. विशेषत: मधुमेह रुग्णांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.
1/7
दिवाळी म्हटलं की मिठाई, गोडधोड आलंच. अनेकजण शुगर, बीपीच्या त्रासामुळे गोडधोड खाणं टाळतात. पण काहीवेळा मोह टाळला जात नाही आणि एखादा पदार्थ खाल्ला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खाणं देखील त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. तेव्हा वेळीच योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
दिवाळी म्हटलं की मिठाई, गोडधोड आलंच. अनेकजण शुगर, बीपीच्या त्रासामुळे गोडधोड खाणं टाळतात. पण काहीवेळा मोह टाळला जात नाही आणि एखादा पदार्थ खाल्ला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खाणं देखील त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. तेव्हा वेळीच योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
2/7
अचानक शुगर वाढणे हृदयासाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. असे न करणे धोकादायक ठरू शकते. मात्र, घाबरण्याची गरज नाही. काही टिप्सचा अवलंब करून तुम्ही रक्तातील साखर लगेच नियंत्रित करू शकता. . याबाबत लोकल18 सोबत बोलताना डॉ. ललित कौशिक (एमडी) यांनी माहिती दिलीये.
अचानक शुगर वाढणे हृदयासाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. असे न करणे धोकादायक ठरू शकते. मात्र, घाबरण्याची गरज नाही. काही टिप्सचा अवलंब करून तुम्ही रक्तातील साखर लगेच नियंत्रित करू शकता. . याबाबत लोकल18 सोबत बोलताना डॉ. ललित कौशिक (एमडी) यांनी माहिती दिलीये.
advertisement
3/7
शुगरच्या समस्येने त्रस्त असलेल्य लोकांनी सणासुदीच्या काळात खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी. जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. अशा स्थितीत रक्तातील साखरेवर लवकरात लवकर नियंत्रण ठेवण्याची गरज असते.
शुगरच्या समस्येने त्रस्त असलेल्य लोकांनी सणासुदीच्या काळात खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी. जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. अशा स्थितीत रक्तातील साखरेवर लवकरात लवकर नियंत्रण ठेवण्याची गरज असते.
advertisement
4/7
शुगरच्या रुग्णांनी सकाळी लिंबूपाणी किंवा गरम पाणी पिऊ शकतात. मधुमेहावर वेगाने नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्ण सलग 16 तासांचा उपवास करू शकतात. या दरम्यान फक्त लिंबूपाणी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. दीर्घ उपवास केल्याने मधुमेह लवकर आटोक्यात येतो. शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.
शुगरच्या रुग्णांनी सकाळी लिंबूपाणी किंवा गरम पाणी पिऊ शकतात. मधुमेहावर वेगाने नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्ण सलग 16 तासांचा उपवास करू शकतात. या दरम्यान फक्त लिंबूपाणी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. दीर्घ उपवास केल्याने मधुमेह लवकर आटोक्यात येतो. शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.
advertisement
5/7
मधुमेहाच्या रुग्णांनी सण-उत्सवांत खाण्या-पिण्याबाबत काळजी घ्यावी. तुमची औषधे वेळेवर घ्या आणि गोड खाणे टाळा. रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय बदल झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं डॉ.ललित कौशिक सांगतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी सण-उत्सवांत खाण्या-पिण्याबाबत काळजी घ्यावी. तुमची औषधे वेळेवर घ्या आणि गोड खाणे टाळा. रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय बदल झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं डॉ.ललित कौशिक सांगतात.
advertisement
6/7
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी काही प्रमाणात नियंत्रित करू शकता. त्यासाठी दैनंदिन डाएट आणि व्यायाम गरजेचा असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी काही प्रमाणात नियंत्रित करू शकता. त्यासाठी दैनंदिन डाएट आणि व्यायाम गरजेचा असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
7/7
शुगरवर नियंत्रणासाठी डॉक्टरांनी इन्सुलिनचा डोस घेण्याचा सल्ला देत असतील तर तसे करा. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारे स्वत:च औषधोपचार करू नये. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कोणतेही पाऊल उचलले पाहिजे, असेही डॉ. कौशिक सांगतात.
शुगरवर नियंत्रणासाठी डॉक्टरांनी इन्सुलिनचा डोस घेण्याचा सल्ला देत असतील तर तसे करा. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारे स्वत:च औषधोपचार करू नये. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कोणतेही पाऊल उचलले पाहिजे, असेही डॉ. कौशिक सांगतात.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement