टूथपेस्ट बदलली, तरी तोंडाचा वास जाईना? ही दुर्गंधी श्वासांची; आता उपाय एकच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपण बराच वेळ शांत बसलो की, तोंडातून एक दुर्गंध येऊ लागतो. म्हणूनच आपण दुपारच्या झोपेनंतर चूळ भरतो आणि प्रवासात आंबट गोळ्या सोबत ठेवतो. परंतु हे कधीतरी होणं सामान्य आहे, मात्र काही लोकांच्या तोंडाला वर्षाचे बारा महिने दुर्गंधच असतो. मग त्यांनी कितीही टूथपेस्ट बदलल्या किंवा नको नको ते माऊथ फ्रेशनर वापरले तरी तोंड उघडताच वासच वास येतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही खालावतो, मग यावर उपाय तरी काय? उपाय अगदी सोपा आहे.
advertisement
advertisement
उत्तराखंडच्या चमोली भागातील डॉ. रजत सांगतात की, आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे विविध आजारांपासून शरिराचं रक्षण होतं. तसंच तोंडात झालेली प्रत्येक जखम आवळ्यामुळे बरी होते. आवळ्यामुळे श्वासांची दुर्गंधीही दूर होते. अर्थातच आवळा खाल्ल्यास तोंडातून उग्र वास येत नाही. तसंच आवळ्यात क्रोमियम नावाचं तत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आवळ्यामुळे हृदयाचं आरोग्यही सुदृढ राहतं. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. शिवाय युरिन इंन्फेक्शनवरही आराम मिळतो. डॉक्टर सांगतात की, जेवणापूर्वी दही आणि मधासोबत आवळ्याची पावडर खावी, त्यामुळे पचनासंबंधित सर्व समस्या दूर होतात. परंतु आवळा अत्याधिक प्रमाणात खाऊ नये, असंही डॉक्टर सांगतात.
advertisement


