River : भारतातील सर्वात लहान नदी कोणती? तुमचं GK Strong असेल तर द्या उत्तर, 99 टक्के लोकांना हे माहितच नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पूर्णपणे कोरडी पडलेली, नकाशावरून पुसली गेलेली एक नदी केवळ सामान्य माणसांच्या जिद्दीमुळे पुन्हा खळाळून वाहू लागली, तर तुमचा विश्वास बसेल का?
पाणी म्हणजे जीवन. आपण सर्वच जण हे वाक्य ऐकत मोठे झालो आहोत. पण आजच्या काळात जेव्हा नद्या प्रदूषित होत आहेत किंवा कोरड्या पडत आहेत, तेव्हा मनामध्ये एक भीती दाटून येते की पुढच्या पिढीला पिण्यासाठी पाणी तरी मिळेल का? पण, जर मी तुम्हाला सांगितलं की, पूर्णपणे कोरडी पडलेली, नकाशावरून पुसली गेलेली एक नदी केवळ सामान्य माणसांच्या जिद्दीमुळे पुन्हा खळाळून वाहू लागली, तर तुमचा विश्वास बसेल का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
1995 मध्ये या भागाचं नशीब बदललं. प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह आणि तरूण भारत संघ या संस्थेने गावकऱ्यांच्या मदतीने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी सरकारकडे हात न पसरता स्वतःच्या हाताने पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी 300 हून अधिक मातीचे छोटे बंधारे बांधले.
advertisement
advertisement
या नदीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं व्यवस्थापन! गावकऱ्यांनी मिळून 'अरवरी संसद' स्थापन केली आहे. या नदीच्या पाण्याचा वापर कसा करायचा, कोणती पिके घ्यायची आणि नदीचे प्रदूषण कसे रोखायचे, याचे सर्व निर्णय ही संसद घेते. स्थानिक पातळीवर जल व्यवस्थापन कसे असावे, याचे हे जगातले उत्तम उदाहरण मानले जाते.
advertisement









