advertisement

2 दिवस विश्रांती घेऊन पाऊस थकला, मराठवाड्याला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!

Last Updated:
गेल्या 2 दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर ओसरलाय. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं उघडीप दिली असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतो. त्यात आता छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर)
1/5
पावसानं विश्रांती घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात उकाडा वाढलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. 
पावसानं विश्रांती घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात उकाडा वाढलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
हवामान विभागानं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, इत्यादी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. 
हवामान विभागानं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, इत्यादी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
3/5
मराठवाड्यात यंदा झालेल्या जोरदार पावसानं शेतीचं आतोनात नुकसान केलं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आतादेखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. 
मराठवाड्यात यंदा झालेल्या जोरदार पावसानं शेतीचं आतोनात नुकसान केलं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आतादेखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
मराठवाड्यात जुलैपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली होती. 31 ऑगस्टच्या रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं इथलं जनजीवन पूरतं विस्कळीत झालं, पिकांची प्रचंड नासधूस झाली. तसंच आता काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांना मोड आल्याचं चित्र आहे.
मराठवाड्यात जुलैपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली होती. 31 ऑगस्टच्या रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं इथलं जनजीवन पूरतं विस्कळीत झालं, पिकांची प्रचंड नासधूस झाली. तसंच आता काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांना मोड आल्याचं चित्र आहे.
advertisement
5/5
मुसळधार पावसामुळे पुन्हा पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काढलेला माल सुरक्षित ठेवावा. तसंच बदलत्या वातावरणात सर्वांनी आपापलं आरोग्य जपणं आवश्यक आहे.
मुसळधार पावसामुळे पुन्हा पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काढलेला माल सुरक्षित ठेवावा. तसंच बदलत्या वातावरणात सर्वांनी आपापलं आरोग्य जपणं आवश्यक आहे.
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement