लोणावळ्याचा प्लॅन शेवटचा ठरला! सिनेमा अन् पहाटेचा सूर्योदय; पवई IITच्या 3 मित्रांचा करुण अंत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पनवेलजवळ आयआयटी पवईच्या तीन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू. ओम कुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देशभ्रतार जागीच ठार. चौथा मित्र गंभीर जखमी. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर.
पनवेल, प्रतिनिधी विश्वनाथ सावंत: मज्जा मस्ती, पाहिलेल्या सिनेमावर चर्चा आणि गाडीत सुरू असलेली गाणी, खिदळत मित्रांची मजा सुरू होती. मात्र नियती असा विचित्र घात करे असं कुणाच्या मनात नव्हतं. रक्त सळसळतं आणि गाडी चालवण्याचा जोश, त्यामुळे गप्पांच्या नादात गाडीनं कधी स्पीड घेतला ते समजलंच नाही आणि अचानक होत्याचं नव्हतं झालं. कारचा चुराडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. कारचा अक्षरश: चक्का चूर झाला. एका क्षणात सगळं संपली.
advertisement
advertisement
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईतील सहा मित्र दोन-तीन गाड्यांमधून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहिल्यानंतर, सूर्योदय पाहण्याचा बेत त्यांनी आखला. लोणावळ्याचा फेरफटका मारून हे सर्वजण १८ मार्चच्या पहाटे लोणावळ्याच्या दिशेनं जात असताना भातान बोगदा ओलांडल्यानंतर अवघ्या दीड किलोमीटरवर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
advertisement
advertisement
हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात ओम कुमार बोरसे (नाशिक), श्रेयांश शर्मा (जयपूर) आणि लय देशभ्रतार (नागपूर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवून सर्वांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
advertisement
advertisement









