Weather Alert: कोकणात वातावरण तापलं, मुंबई-ठाण्यात वेगळाच अलर्ट, गुरुवारचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. ऐन थंडीच्या दिवसांत उन्हाचे चटके जाणवत असून मुंबई-ठाण्यात देखील विचित्र हवामान दिसत आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी थोडीशी गार हवा आता कमी झाली आहे. सकाळचा गारवा जवळजवळ संपला असून, वातावरणात उष्णता पुन्हा वाढू लागली आहे. आकाश स्वच्छ व कोरडे असल्यामुळे आजही संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उकाडा आणि उष्ण हवामान कायम राहणार आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे, तर रात्रीची थंडी देखील विशेष जाणवणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी थोडीशी गार हवा आता कमी झाली आहे. सकाळचा गारवा जवळजवळ संपला असून, वातावरणात उष्णता पुन्हा वाढू लागली आहे. आकाश स्वच्छ व कोरडे असल्यामुळे आजही संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उकाडा आणि उष्ण हवामान कायम राहणार आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे, तर रात्रीची थंडी देखील विशेष जाणवणार नाही.
advertisement
2/5
मुंबईत आज उष्णता वाढलेलीच राहणार आहे. किमान तापमान साधारण 22°C च्या आसपास राहील, तर कमाल तापमान 33°C पर्यंत जाईल. दिवसा उकाडा जाणवेल आणि संध्याकाळीही गारवा फारसा जाणवणार नाही. हवा कोरडी असल्याने थंडीचा परिणाम विशेष दिसणार नाही.
मुंबईत आज उष्णता वाढलेलीच राहणार आहे. किमान तापमान साधारण 22°C च्या आसपास राहील, तर कमाल तापमान 33°C पर्यंत जाईल. दिवसा उकाडा जाणवेल आणि संध्याकाळीही गारवा फारसा जाणवणार नाही. हवा कोरडी असल्याने थंडीचा परिणाम विशेष दिसणार नाही.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणीही हवामान जवळपास एकसारखेच ठेवणार आहे. किमान तापमान 21–22°C दरम्यान राहील, तर कमाल तापमान 33–34°C पर्यंत पोहोचेल. गेल्या दोन-तीन दिवसांत जाणवणारा थोडासा गारवा आता जवळजवळ कमी झाला असून दिवसभर हलका उकाडा जाणवेल.
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणीही हवामान जवळपास एकसारखेच ठेवणार आहे. किमान तापमान 21–22°C दरम्यान राहील, तर कमाल तापमान 33–34°C पर्यंत पोहोचेल. गेल्या दोन-तीन दिवसांत जाणवणारा थोडासा गारवा आता जवळजवळ कमी झाला असून दिवसभर हलका उकाडा जाणवेल.
advertisement
4/5
पालघरमध्ये आज सकाळपासूनच वातावरण थंडगार आहे. किमान तापमान 18–20°C पर्यंत राहील, तर दुपारी पारा 30–31°C पर्यंत जाऊ शकतो. हवामान कोरडे राहील आणि पाऊस नाही. गावठाण भाग असल्यामुळे दुपारी उब जाणवेल, परंतु संध्याकाळी पुन्हा हलकी थंडी जाणवेल. आकाश स्वच्छ असेल.
पालघरमध्ये आज सकाळपासूनच वातावरण थंडगार आहे. किमान तापमान 18–20°C पर्यंत राहील, तर दुपारी पारा 30–31°C पर्यंत जाऊ शकतो. हवामान कोरडे राहील आणि पाऊस नाही. गावठाण भाग असल्यामुळे दुपारी उब जाणवेल, परंतु संध्याकाळी पुन्हा हलकी थंडी जाणवेल. आकाश स्वच्छ असेल.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवर, म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत आज हवामान शांत आणि कोरडे राहेल. सकाळी हलकासा गारवा जाणवले. किमान तापमान 20–22°C तर कमाल तापमान 30–32°C पर्यंत जाईल. पावसाची कुठेही शक्यता नाही. समुद्रकिनारी भागांमध्ये वारा असल्याने दुपारी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. संध्याकाळ ते रात्री तापमान पुन्हा 22–23°C वर येईल आणि हवेत हलकी थंडी जाणवेल
कोकण किनारपट्टीवर, म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत आज हवामान शांत आणि कोरडे राहेल. सकाळी हलकासा गारवा जाणवले. किमान तापमान 20–22°C तर कमाल तापमान 30–32°C पर्यंत जाईल. पावसाची कुठेही शक्यता नाही. समुद्रकिनारी भागांमध्ये वारा असल्याने दुपारी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. संध्याकाळ ते रात्री तापमान पुन्हा 22–23°C वर येईल आणि हवेत हलकी थंडी जाणवेल
advertisement
ZP Election : दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडेट
दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडट
  • जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लागला असला तरी आता निकालाला ब्रेक लागण्याची शक्य

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालावर प्रश्न निर्माण झाले आहे.

  • निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्यास जिल्हा परिषदेचा निकाल रखडण्याची भीती

View All
advertisement