Weather Alert: वारं फिरलं, कोकणात टेन्शन वाढलं! 72 तास धोक्याचे, मुंबई-ठाण्यात हायअलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाण्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून आज, 27 सप्टेंबर रोजीही पाऊस तसाच सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आज संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
मुंबईत आज दिवसभर मुसळधार पाऊस पडणार आहे. काल दिवसभर रिमझिम ते मध्यम सरी झाल्या होत्या, मात्र आज सकाळपासूनच आकाश ढगाळ असून जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईत दिवसभर मुसळधार सरी कोसळतील. दुपारनंतर पावसाचा वेग अधिक वाढेल आणि संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून दमट वातावरणामुळे.
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही कोकण जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगडमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भूस्खलनाचा धोका कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. सलग तीन दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.