Weather Alert: मुंबई-ठाण्यात आज पाऊस की उघडीप, कोकणातून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: ऑक्टोबर अखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह कोकण परिसरातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
1/5
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता विश्रांती घेण्याची शक्यता आहे. बंगालमधील वादळामुळे ऑक्टोबरच्या अखेरीसही पावसाचा जोर कायम राहिला. आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोर ओसरणार आहे. आठवडाभर यलो अलर्ट असलेल्या या भागांत आज म्हणजेच 30 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान विभागाने पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता विश्रांती घेण्याची शक्यता आहे. बंगालमधील वादळामुळे ऑक्टोबरच्या अखेरीसही पावसाचा जोर कायम राहिला. आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोर ओसरणार आहे. आठवडाभर यलो अलर्ट असलेल्या या भागांत आज म्हणजेच 30 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान विभागाने पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.
advertisement
2/5
मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत होता, पण आता आकाशात हलके ढग असून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत हवामान दमट राहील, पण मुसळधार सरींची शक्यता नाही. तापमान थोडं वाढलेलं जाणवेल, मात्र वातावरण स्थिर राहील.
मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत होता, पण आता आकाशात हलके ढग असून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत हवामान दमट राहील, पण मुसळधार सरींची शक्यता नाही. तापमान थोडं वाढलेलं जाणवेल, मात्र वातावरण स्थिर राहील.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही गेल्या आठवड्याभरात यलो अलर्ट होता. परंतु, आता या भागात हवामान सुधारलं असून आज कोणताही पावसाचा इशारा नाही. हलकी ढगाळ हवा आणि सौम्य वारे असल्याने वातावरण आनंददायी आहे. पुढील दोन दिवसही या भागात पाऊस पडण्याची शक्यता अत्यल्प आहे.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही गेल्या आठवड्याभरात यलो अलर्ट होता. परंतु, आता या भागात हवामान सुधारलं असून आज कोणताही पावसाचा इशारा नाही. हलकी ढगाळ हवा आणि सौम्य वारे असल्याने वातावरण आनंददायी आहे. पुढील दोन दिवसही या भागात पाऊस पडण्याची शक्यता अत्यल्प आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात मात्र आजही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे विभागाने सावधगिरीचा इशारा कायम ठेवला आहे. किनारी भागात वारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
पालघर जिल्ह्यात मात्र आजही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे विभागाने सावधगिरीचा इशारा कायम ठेवला आहे. किनारी भागात वारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान स्थिर झालं आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, आज कोणताही येलो अलर्ट नाही. हवामान खात्यानुसार, या भागात हलकी ढगाळ हवा आणि अधूनमधून सूर्यप्रकाश दिसेल. मात्र, समुद्रकिनारी नागरिकांनी अजूनही खबरदारी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान स्थिर झालं आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, आज कोणताही येलो अलर्ट नाही. हवामान खात्यानुसार, या भागात हलकी ढगाळ हवा आणि अधूनमधून सूर्यप्रकाश दिसेल. मात्र, समुद्रकिनारी नागरिकांनी अजूनही खबरदारी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement