Mumbai Rain: कोकणात पुन्हा हवापालट, ठाणे-मुंबईत धो धो कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात गेल्या काही दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. आता हवामानात पुन्हा बदल जाणवत असून या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
1/5
गेली अनेक दिवस कोकण किनारपट्टीवर आणि आसपासच्या भागात पावसाच्या सरी येत-जात होत्या. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. मात्र, आजचे हवामान वेगळे आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकण किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. बहुतेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.
गेली अनेक दिवस कोकण किनारपट्टीवर आणि आसपासच्या भागात पावसाच्या सरी येत-जात होत्या. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. मात्र, आजचे हवामान वेगळे आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकण किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. बहुतेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसभर आभाळ दाटलेले राहील आणि सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू राहतील. कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 25°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाडाही जाणवू शकतो.
मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसभर आभाळ दाटलेले राहील आणि सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू राहतील. कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 25°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाडाही जाणवू शकतो.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 24°C असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडू शकते. प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे. नागरिकांनी काही भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 24°C असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडू शकते. प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे. नागरिकांनी काही भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी.
advertisement
4/5
मुंबई परिसर तसंच ठाणे आणि नवी मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असला तरी तुलनेने पालघर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पालघरला कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. कमाल तापमान 30°C तर किमान तापमान 25°C राहील. हवामान ढगाळ राहणार असून अधूनमधून सरी बरसतील.
मुंबई परिसर तसंच ठाणे आणि नवी मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असला तरी तुलनेने पालघर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पालघरला कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. कमाल तापमान 30°C तर किमान तापमान 25°C राहील. हवामान ढगाळ राहणार असून अधूनमधून सरी बरसतील.
advertisement
5/5
मुंबई ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट लागू आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिवसभर जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C ते 30°C तर किमान तापमान 24°C ते 25°C दरम्यान राहील. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट लागू आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिवसभर जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29°C ते 30°C तर किमान तापमान 24°C ते 25°C दरम्यान राहील. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement