Mumbai Rain: महिनाअखेर बदलली हवा, मुंबई, ठाण्याला अलर्ट नवा, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: जुलै महिन्याच्या अखेरीस कोकणच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबई, ठाण्यातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
ऐन पावसाळ्याच्या काळात, जिथे मुसळधार पावसाची अपेक्षा असते, तिथे कोकण किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या पावसाने दडी मारली आहे. श्रावण महिन्यात सामान्यतः पावसाचा जोर अधिक असतो, मात्र सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसारख्या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल जाणवत आहे.
ऐन पावसाळ्याच्या काळात, जिथे मुसळधार पावसाची अपेक्षा असते, तिथे कोकण किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या पावसाने दडी मारली आहे. श्रावण महिन्यात सामान्यतः पावसाचा जोर अधिक असतो, मात्र सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसारख्या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल जाणवत आहे.
advertisement
2/5
मुंबईत ऐन पावसाळ्याच्या काळात, जिथे मुसळधार सरींची अपेक्षा असते, तिथे कोकण किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने दडी मारली आहे. आजही मुंबईमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. श्रावण महिन्यात सामान्यतः पावसाचा जोर अधिक असतो, मात्र सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसारख्या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल जाणवत आहे.
मुंबईत ऐन पावसाळ्याच्या काळात, जिथे मुसळधार सरींची अपेक्षा असते, तिथे कोकण किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने दडी मारली आहे. आजही मुंबईमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. श्रावण महिन्यात सामान्यतः पावसाचा जोर अधिक असतो, मात्र सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसारख्या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल जाणवत आहे.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. सुरुवातीला जोरदार पावसाने हजेरी लावली होती, पण आता वातावरण स्थिर झालं आहे. हवामान विभागाकडून देखील सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. आकाश ढगाळ असतं, मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. सुरुवातीला जोरदार पावसाने हजेरी लावली होती, पण आता वातावरण स्थिर झालं आहे. हवामान विभागाकडून देखील सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. आकाश ढगाळ असतं, मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात काही भागांत जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र आता संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण तुलनेने शांत आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी काही ठिकाणी बरसल्या तरी मुसळधार पावसाचा मागमूस नाही. हवामान कोरडं आणि दमट असल्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात काही भागांत जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र आता संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण तुलनेने शांत आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी काही ठिकाणी बरसल्या तरी मुसळधार पावसाचा मागमूस नाही. हवामान कोरडं आणि दमट असल्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे.
advertisement
5/5
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला होता. मात्र आता या भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. आकाश ढगाळ असलं तरी पावसाच्या सरी अत्यंत मर्यादित प्रमाणात पडत आहेत. समुद्र किनाऱ्यावर हवा दमट आहे आणि उकाड्याची तीव्रता वाढलेली आहे. सध्या कोणताही हवामान अलर्ट नाही.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला होता. मात्र आता या भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. आकाश ढगाळ असलं तरी पावसाच्या सरी अत्यंत मर्यादित प्रमाणात पडत आहेत. समुद्र किनाऱ्यावर हवा दमट आहे आणि उकाड्याची तीव्रता वाढलेली आहे. सध्या कोणताही हवामान अलर्ट नाही.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement