advertisement

Weather Alert: कोकणात वारं फिरलं, सिंधुदुर्गला पुन्हा अलर्ट, मुंबई-ठाण्यातून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मुंबई-ठाण्यासह कोकणातील गुरुवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/4
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा काही भागांमध्ये पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टीवरील भागात आज (9 ऑक्टोबर) मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा काही भागांमध्ये पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टीवरील भागात आज (9 ऑक्टोबर) मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.
advertisement
2/4
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आभाळ भरून आलेलं असून दिवसाच्या पहिल्या सत्रात रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील. दुपारपर्यंत आकाश ढगाळ राहील. तापमान 29°C ते 32°C च्या दरम्यान राहील. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान तुलनेने स्थिर झालं आहे.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आभाळ भरून आलेलं असून दिवसाच्या पहिल्या सत्रात रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील. दुपारपर्यंत आकाश ढगाळ राहील. तापमान 29°C ते 32°C च्या दरम्यान राहील. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान तुलनेने स्थिर झालं आहे.
advertisement
3/4
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असून, अनेक भागांमध्ये अधूनमधून सरी कोसळत आहेत. समुद्रकिनारी भागांमध्ये वसई, विरार, डहाणू आणि तलासरी परिसरात वार्‍याचा वेग वाढला असून सागरी वारे 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वाहत आहेत. तापमान 27°C ते 30°C च्या दरम्यान राहणार आहे. वातावरणात किंचित गारवा जाणवेल, मात्र आर्द्रता जास्त असल्याने उकाडाही जाणवेल.
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असून, अनेक भागांमध्ये अधूनमधून सरी कोसळत आहेत. समुद्रकिनारी भागांमध्ये वसई, विरार, डहाणू आणि तलासरी परिसरात वार्‍याचा वेग वाढला असून सागरी वारे 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वाहत आहेत. तापमान 27°C ते 30°C च्या दरम्यान राहणार आहे. वातावरणात किंचित गारवा जाणवेल, मात्र आर्द्रता जास्त असल्याने उकाडाही जाणवेल.समुद्रकिनारी भागांमध्ये — वसई, विरार, डहाणू आणि तलासरी परिसरात — वार्‍याचा वेग वाढला असून सागरी वारे 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वाहत आहेत. तापमान 27°C ते 30°C च्या दरम्यान राहणार आहे. वातावरणात किंचित गारवा जाणवेल, मात्र आर्द्रता जास्त असल्याने उकाडाही जाणवेल.
advertisement
4/4
कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहू शकतो. मच्छिमारांना समुद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही.
कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहू शकतो. मच्छिमारांना समुद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही.
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement