Weather Alert: हवामानात मोठे बदल! कोकणात पावसाचा ब्रेक, मुंबई-ठाण्यासाठी शनिवारी कोणता अलर्ट?

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह सर्व जिल्ह्यांत पावसाने उघडीप घेतली असून उकाडा वाढत आहे.
1/5
सप्टेंबरमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी पाणी साचले, तर काही भागांतील वाहतूक विस्कळीत झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज, 4 ऑक्टोबर रोजी या सर्व जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली असून कोणत्याही भागाला हवामान विभागाने अलर्ट दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सप्टेंबरमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी पाणी साचले, तर काही भागांतील वाहतूक विस्कळीत झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज, 4 ऑक्टोबर रोजी या सर्व जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली असून कोणत्याही भागाला हवामान विभागाने अलर्ट दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
2/5
मुंबई, मुंबई उपनगर परिसरात आज वातावरण सामान्य राहील. सकाळपासून आकाश आंशिक ढगाळ आहे, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही. दिवसात 28 ते 31 अंश सेल्सिअस तापमान राहील. दमट हवेमुळे किंचित उकाडा जाणवेल, मात्र मोठ्या प्रमाणावर पावसाचा त्रास होणार नाही.
मुंबई, मुंबई उपनगर परिसरात आज वातावरण सामान्य राहील. सकाळपासून आकाश आंशिक ढगाळ आहे, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही. दिवसात 28 ते 31 अंश सेल्सिअस तापमान राहील. दमट हवेमुळे किंचित उकाडा जाणवेल, मात्र मोठ्या प्रमाणावर पावसाचा त्रास होणार नाही.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरात कालपर्यंत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र आज पावसाला पूर्ण विश्रांती मिळाली आहे. शहरांमध्ये सामान्य हालचाल सुरळीत सुरू आहे. आकाश ढगाळ असले तरी पावसाचा त्रास होणार नाही. दिवसात तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्याचा वेग सुमारे 12 किमी प्रतितास असेल. दमट हवेमुळे वातावरण उष्ण वाटेल.
ठाणे व नवी मुंबई परिसरात कालपर्यंत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र आज पावसाला पूर्ण विश्रांती मिळाली आहे. शहरांमध्ये सामान्य हालचाल सुरळीत सुरू आहे. आकाश ढगाळ असले तरी पावसाचा त्रास होणार नाही. दिवसात तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्याचा वेग सुमारे 12 किमी प्रतितास असेल. दमट हवेमुळे वातावरण उष्ण वाटेल.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते, काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. पण आज हवामान स्थिर आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची चिन्हे नाहीत. किनारी गावांमध्ये ओलसर हवा टिकून आहे, तर शहर भागात वातावरण तुलनेने उष्ण राहील. आजचे तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग साधारण 10–12 किमी प्रतितास असेल.
पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते, काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. पण आज हवामान स्थिर आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची चिन्हे नाहीत. किनारी गावांमध्ये ओलसर हवा टिकून आहे, तर शहर भागात वातावरण तुलनेने उष्ण राहील. आजचे तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग साधारण 10–12 किमी प्रतितास असेल.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही किनारी जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात झालेला जोरदार पाऊस आज थांबला असून हवामान स्थिर झाले आहे. आकाश ढगाळ राहील पण मोठ्या पावसाची शक्यता नाही. आजचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. दमट हवेमुळे उष्णता अधिक जाणवेल.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही किनारी जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात झालेला जोरदार पाऊस आज थांबला असून हवामान स्थिर झाले आहे. आकाश ढगाळ राहील पण मोठ्या पावसाची शक्यता नाही. आजचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. दमट हवेमुळे उष्णता अधिक जाणवेल.
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement