मुंबईकर सावधान! अरबी समुद्र खवळणार, सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार, 24 दिवस महत्त्वाचे!
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai weather Alert: प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे.
सध्या मोठे बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले होते, तर आता मार्च महिन्यातच राज्यातील काही भागात पावसाच्या सरी आणि गारपीटही पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणात पावसाळ्याला अवघे तीन महिने शिल्लक असताना, मुंबईसमोर पुन्हा एकदा पाणी साचण्याचा धोका उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
मुंबई महापालिकेकडून पावसाळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, जून ते सप्टेंबर या काळात तब्बल 24 दिवस समुद्राला भरती येणार आहे. विशेष म्हणजे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक उंच भरती येणार असून, काही दिवशी समुद्राच्या लाटा 4.8 मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंत उसळण्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









