मुंबईकरांसाठी 48 तास धोक्याची घंटा, घराबाहेर न पडण्याचा इशारा, IMD कडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात मे महिन्यासारखी परिस्थिती आली आहे. मुंबईसह राज्यात ही परिस्थिती का ओढवली, काय कारण आहे? हे जाणून घेऊया. हवामान विभागाने घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते, सध्या राजस्थान आणि पश्चिम पाकिस्तानच्या बाजूने येणारे अँटी-सायक्लोन सक्रिय झाले आहे. यामुळे आकाशातील ढग पूर्णपणे गायब झाले असून कडक ऊन जमिनीवर येत आहे. तसेच, उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे आणि गरम वारे महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचत असल्याने तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.








