Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, 24 तास धोक्याचे, 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. राज्यात उष्णतेची लाट अन् अवकाळी पावसाचं दुहेरी संकट घोंघावत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा धोका असून मुंबईसह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस अन् गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 23 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
कोकणातील अवकाळी पावसाचा धोका संपला असला तरी पुन्हा नवं संकट आलं आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी कमाल तापमानाचा पारा 29 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दमट हवामानामुळे उकाडा जास्त राहील.
advertisement
मध्य महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट घोंघावत आहे. सोलापूरसह, सातारा आणि सांगली भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापुरात देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे, या काळात पुण्यातील तापमानाचा पारा 31 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
advertisement
मराठवाड्यावर देखील अवकाळीचे काळे ढग पुन्हा दाटले आहे त. सोमवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल. तर बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि परभणी जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement










