Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवा बदलणार, गुरुवारी कुठं कोसळणार? कोल्हापूर ते पुणे हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुणे घाटभागात आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला असून 5 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 60.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 25.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे दक्षतेचा ऑरेंज अलर्ट आयएमडीने दिला आहे.
advertisement
सातारा परिसरात मागील 24 तासांत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. पाणी पातळी नियंत्रित धरणाचे सहा वक्र दरवाजे बारा फुटांपर्यंत उघडले आहेत. कोयना धरणातून सध्या 95300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील 24 तासात सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पाणी पातळीत अनखी वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणातून 4356 क्युसिक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाच्या जोर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे पूरसदृश्य स्थितीला सामोरे जात असलेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळू शकतो.
advertisement
advertisement
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोयना आणि वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी चालूच आहे. मात्र पुढील 24 तासांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या कोयना धरणातून 95300 क्युसेक तसेच वारणा धरणातून 24090 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याने नदीकाठच्या क्षेत्रामध्ये पुराचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
advertisement
मुसळधार पावसाचा कहर सगळीकडे सुरू असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली जात आहे. मात्र पुढील 24 तासात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकतो.


