Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, 25 ऑगस्टला धो धो पाऊस, 11 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: 25 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. अशातच ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या सरी देखील बरसत आहेत. 25 ऑगस्ट रोजी कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह पावसाची मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
advertisement







