Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचं कमबॅक, 21 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आगामी काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 25 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आगामी काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पाहुयात 25 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कसं असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ असा संपूर्ण राज्यावर असणार आहे.











